शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

२११ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज ...

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. गुरुवारी तीन तालुक्यांत अर्ज आले. यात कळमनुरी १७, औंढा ११, हिंगोली २२ अशी संख्या आहे. मात्र यंदा विविध अडचणींसह लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मोठी धांदल उडत आहे. त्यातच खर्च करण्यासाठी नवीन बँक खाते उघडायला सांगितले असून ते उघडण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत. तर जुन्या खात्यात यापूर्वी फारसा व्यवहार नसतानाही हे खाते स्वीकारले जात नसल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याचीच अनेकांची पंचाईत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर प्रशासनाने उपाय काढणे गरजेचे असून अनेकजण यावरून ओरड करताना दिसत आहेत.

मागच्या वेळीही खर्च वेळेत दाखल न केल्याचे जिल्ह्यात तब्बल २११ प्रकार घडले होते. यात सर्वाधिक ६७ उमेदवार हे हिंगोली तालुक्यातील आहेत. निवडणुकीनंतर सहा महिन्यांपर्यंत खर्च दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदत दिलेली आहे. त्यानंतरही खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांवर कारवाई केली होती. अशांना यावेळी निवडणूक लढता येणार नसून अशा उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसील कार्यालयांना पाठविली आहे. त्यामुळे अशांची यावेळी निवडणूक लढण्याची इच्छा झाली तरीही त्यांना रिंगणात येता येणार नाही.

५० हजारांची खर्च मर्यादा

ग्रामपंचायतीच्या एका उमेदवाराला ५० हजारांपर्यंतचा खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे जेथे लहान ग्रामपंचायती आहेत, तेथे ५, ७, ९ तर मोठ्यांत ११, १३, १७ अशी सदस्य संख्या आहे

पॅनलप्रमुखांना जास्त सदस्य संख्येच्या गावांत प्रति सदस्याप्रमाणे जास्त खर्च करता येणार आहे. मात्र अनेक गावांत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाला तरीही तो कागदावर काही येत नाही. अनेकांचे खर्च तर आताच सुरू झाले आहेत.