शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२११ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज ...

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. गुरुवारी तीन तालुक्यांत अर्ज आले. यात कळमनुरी १७, औंढा ११, हिंगोली २२ अशी संख्या आहे. मात्र यंदा विविध अडचणींसह लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मोठी धांदल उडत आहे. त्यातच खर्च करण्यासाठी नवीन बँक खाते उघडायला सांगितले असून ते उघडण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत. तर जुन्या खात्यात यापूर्वी फारसा व्यवहार नसतानाही हे खाते स्वीकारले जात नसल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याचीच अनेकांची पंचाईत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर प्रशासनाने उपाय काढणे गरजेचे असून अनेकजण यावरून ओरड करताना दिसत आहेत.

मागच्या वेळीही खर्च वेळेत दाखल न केल्याचे जिल्ह्यात तब्बल २११ प्रकार घडले होते. यात सर्वाधिक ६७ उमेदवार हे हिंगोली तालुक्यातील आहेत. निवडणुकीनंतर सहा महिन्यांपर्यंत खर्च दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदत दिलेली आहे. त्यानंतरही खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांवर कारवाई केली होती. अशांना यावेळी निवडणूक लढता येणार नसून अशा उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसील कार्यालयांना पाठविली आहे. त्यामुळे अशांची यावेळी निवडणूक लढण्याची इच्छा झाली तरीही त्यांना रिंगणात येता येणार नाही.

५० हजारांची खर्च मर्यादा

ग्रामपंचायतीच्या एका उमेदवाराला ५० हजारांपर्यंतचा खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे जेथे लहान ग्रामपंचायती आहेत, तेथे ५, ७, ९ तर मोठ्यांत ११, १३, १७ अशी सदस्य संख्या आहे

पॅनलप्रमुखांना जास्त सदस्य संख्येच्या गावांत प्रति सदस्याप्रमाणे जास्त खर्च करता येणार आहे. मात्र अनेक गावांत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाला तरीही तो कागदावर काही येत नाही. अनेकांचे खर्च तर आताच सुरू झाले आहेत.