शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१८ गावांसाठी २0 टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:51 IST

उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा अल्पपर्जन्यामुळे सगळीकडेच पाण्यासाठी हाहाकार उडालेला आहे. मात्र सर्वच गावांची तहान टँकरवर भागविणे शक्य नाही. अनेक गावांत अधिग्रहणासाठी स्त्रोत उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ टंचाईचा सामना करीत आहेत. विशेष म्हणजे गावातील वादातून टंचाई भोगणारे ग्रामस्थ शेतात तीन किमी अंतरावर जाऊन पाणी आणत असल्याचेही चित्र काही ठिकाणी आहे.ही विदारक स्थिती असताना ज्या गावांतून वेळेत प्रस्ताव आले, तपासणी झाली अशा गावांना मात्र टँकरने पाणीपुरवठा अथवा अधिग्रहण करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यात ४ गावे व एका वाडीला एका शासकीय व सहा खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ९ खेपा होत आहेत. ४२५0 लोकसंख्येची तहान यावर भागत आहे. तर टँकरसाठी तीन व त्याशिवाय ३५ स्त्रोत अधिग्रहित केले आहेत. कळमनुरी तालुक्यात ८ गावांत सहा खाजगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यात टँकरसाठी ७ तर इतर ४५ अशा ५२ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. एकूण ८0८५ लोकसंख्येची तहान टँकरवर भागत आहे.सेनगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६ टँकरच्या ९ खेपा होत आहेत. टँकरसाठी ४ तर इतर ४४ स्त्रोतांचे अधिग्रहण करून तालुक्याची तहान भागविली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यात २ गावे ३ वाड्यांसाठी ३ टँकरद्वारे ९ खेपा सुरू आहेत. यात टँकरसाठी ३ तर इतर ठिकाणी ३४ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे.टँकर : तालुकानिहाय गावेतालुकानिहाय टँकरग्रस्त गावेहिंगोली तालुक्यात कनका, पेडगाव वाडी व जुमडा, अंधारवाडी, वºहाडी, कळमनुरी तालुक्यात माळधावंडा-खापरखेडा, मसोड, हातमाली, रामवाडी, शिवणी खु., महालिंगी तांडा, कुपटी, सेनगाव तालुक्यातजयपूर, जवळा बु., कहाकर खु., बटवाडी, औंढा तालुक्यात संघनाईक तांडा, येहळेगाव सोळंके, रामेश्वर, काळापाणी तांडा, सेवादास तांडा या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या खेपा वाढत आहेत.अनेक गावांचे टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. पाहणीअंती काही ठिकाणी या दोन्ही उपायांबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अशी गावे तहानलेलीच आहेत.रस्त्यांची अडचण४जिल्ह्यातील काही गावांत रस्त्यांची अडचण असल्याने टँकर पंक्चर होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत राहतात अन् ते वेळेवर येत नाही, असे प्रकार घडत आहेत. काही टँकरच्या योग्य स्थितीत नाहीत. त्यामुळे ही एक अडचणही समोर येत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई