शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:38 IST

अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. महिनाभरात शहरासह ग्रामीण भागात १९ आग लागल्यच्या घटना घडल्या आहेत.मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. तापमानात वाढ होत असल्याने अचानक आग लागण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. २३ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान आगीच्या १९ घटनांची नोंद पालिकेच्या अग्निशामक दलाकडे करण्यात आली आहे. महिनाभरात आग लागून नुकसानीच्या घटनामध्ये वाढ होत चालली असली तरी, पालिकेकडे सध्या एचक अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. एक अग्निशामक मागील सहा महिन्यांपासून नादुरूस्त झाल्याने भंगारात जमा करण्यात आले आले आहे. नवीन अग्निशामकची मागणी केली असून लवकरच पालिकेकडे वाहन उपलब्ध होईल. शिवाय नागरिकांनी दक्ष राहून आगीच्या घटनांबाबबत तात्काळ माहिती द्यावी. व आग लागू नये याची खबदारी सर्वांनीच घ्यावी असे अग्निशामक विभागाचे बाळू बांगर यांनी केले .हिंगोली शहरासह ग्रामीण भागात मागील एका महिन्यात आग लागल्याचे जवळपास १९ घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात अचानक आग लागून घरांचे, दुकानांचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा महिन्यांपासून केवळ एकाच अग्शिामक वाहनांवर काम सुरू आहे.पुर्वी दोन अग्निशाम होते. परंतु त्यातील एक वाहन नादुरूस्त झाल्याने ते भंगारात जमा केले. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार एकाचा वाहनांवर सुरू आहे. नवीन अग्निशामक वाहनाची मागणी करण्यात आली आहे. लवकरच पालिकेला वाहन मिळणार आहे.सध्या कडाक्याचे उन्ह पडत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बीडी, सिगारेटमुळे पेट धरून आग लागेल असे कृत्य कोणी करू नये, शिवाय कचराही सार्वजनिक ठिकाणी जाळू नये.इडोळी येथे आग लागून साहित्य खाक४हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील ज्ञानबा विठोबा पानपट्टे यांच्या आखाड्याला आग लागल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. आगीत शेतीपयोगी औजारे, जमा करून ठेवलेले तुरीचे व, सोयाबीनचे कुटार, वैरण, दोन वर्षाचे शेणखत, गांडूळ खताचे १०० कट्टे अंदाजे ५० क्विंटल असे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यांनी अग्नीशमनला फोन करून दोन विद्युत मोटारी चालू असूनही ही आग आटोक्यात येत नव्हती. अग्नीशमन दल आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या शेतकºयाकडे १० जनावरे आहेत. वैरण जळून खाक झाल्यामुळे या गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न पानपट्टे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग