शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:38 IST

अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. महिनाभरात शहरासह ग्रामीण भागात १९ आग लागल्यच्या घटना घडल्या आहेत.मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढतच चालला आहे. तापमानात वाढ होत असल्याने अचानक आग लागण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. २३ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान आगीच्या १९ घटनांची नोंद पालिकेच्या अग्निशामक दलाकडे करण्यात आली आहे. महिनाभरात आग लागून नुकसानीच्या घटनामध्ये वाढ होत चालली असली तरी, पालिकेकडे सध्या एचक अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. एक अग्निशामक मागील सहा महिन्यांपासून नादुरूस्त झाल्याने भंगारात जमा करण्यात आले आले आहे. नवीन अग्निशामकची मागणी केली असून लवकरच पालिकेकडे वाहन उपलब्ध होईल. शिवाय नागरिकांनी दक्ष राहून आगीच्या घटनांबाबबत तात्काळ माहिती द्यावी. व आग लागू नये याची खबदारी सर्वांनीच घ्यावी असे अग्निशामक विभागाचे बाळू बांगर यांनी केले .हिंगोली शहरासह ग्रामीण भागात मागील एका महिन्यात आग लागल्याचे जवळपास १९ घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात अचानक आग लागून घरांचे, दुकानांचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. परंतु हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा महिन्यांपासून केवळ एकाच अग्शिामक वाहनांवर काम सुरू आहे.पुर्वी दोन अग्निशाम होते. परंतु त्यातील एक वाहन नादुरूस्त झाल्याने ते भंगारात जमा केले. त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार एकाचा वाहनांवर सुरू आहे. नवीन अग्निशामक वाहनाची मागणी करण्यात आली आहे. लवकरच पालिकेला वाहन मिळणार आहे.सध्या कडाक्याचे उन्ह पडत असून तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बीडी, सिगारेटमुळे पेट धरून आग लागेल असे कृत्य कोणी करू नये, शिवाय कचराही सार्वजनिक ठिकाणी जाळू नये.इडोळी येथे आग लागून साहित्य खाक४हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील ज्ञानबा विठोबा पानपट्टे यांच्या आखाड्याला आग लागल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. आगीत शेतीपयोगी औजारे, जमा करून ठेवलेले तुरीचे व, सोयाबीनचे कुटार, वैरण, दोन वर्षाचे शेणखत, गांडूळ खताचे १०० कट्टे अंदाजे ५० क्विंटल असे साहित्य जळून खाक झाले आहे. त्यांनी अग्नीशमनला फोन करून दोन विद्युत मोटारी चालू असूनही ही आग आटोक्यात येत नव्हती. अग्नीशमन दल आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या शेतकºयाकडे १० जनावरे आहेत. वैरण जळून खाक झाल्यामुळे या गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काही नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न पानपट्टे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग