शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:16 IST

रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे. तर ओला व सुका कचºयावर प्रक्रिया करुन जवळपास १८ टन सेंद्रीय खत निर्मित्तीही करण्यात आलेली आहे.हिंगोली शहराने विकासाच्या बाबतीत कात टाकली आहे. पूर्वी कचºयाने माखलेले रस्ते आता पूर्वी सारखे दिसत नाहीत. एवढेच काय तर नागरिकही स्वच्छतेचे काही देणे घेणे नसल्यागत वागत होते. यातून शहराचे सौंदर्य पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर होते. मात्र पालिकेने शहरातील स्वच्छतेकडे लक्ष घातल्याने शहराला सौंदर्य प्राप्त झाले आहे. चार महिन्यांपुर्वी शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारीच एका कंत्राटदाराला दिल्याने, दिवसाकाठी ८४ ते ९० टन कचरा ३२ वाहनाद्वारे शहराबाहेर उचलून नेला जात आहे. आता प्रत्येक नगरातील नागरिकांनाही घंटा गाडीची सवय होऊन बसली आहे. घंटागाडी आली की आपसुकच कचºयाकडे नागरिकांचे लक्ष जात आहे. चार महिन्यात अद्यापर्यंत ३६ हजार ६०० टन कचरा शहरातून बाहेर टाकण्यात आला आहे. त्यातच पालिकेतर्फे शहरात जागो- जागी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्यातही कचरा टाकला जातो. मात्र त्या कचरा कुंड्या वेळीच रिकाम्या केल्या जात नसल्याने रस्त्यावर कचरा सांडत असल्याचे चित्र दिसून येते.शहरातील विविध नगरातील कचरा घंटागाडीद्वारे उचलला जात असला तरी यातील बºया पैकी कचरा गाड्या ढकलस्टार्ट झालेल्या आहेत. तसेच काही वाहनांच्या तर फालक्यातून कचराही रस्त्यावर गळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कचरा उचलणाºया वाहनांची दुरुस्तीकी करणे तेव्हढेचगरजेचे आहे. तसेच ढकलस्टार वाहने असल्याने कोठेही बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध नगरातील नागरिकांना धक्का देऊन वाहने सुरु करण्यास मदत करावी लागत आहे. गाडीची सवय झालेली असल्याने तीची दुरुस्तीही करणे गरजेचे आहे.शहरातून उचलण्यात येणाºया कचºयावर प्रक्रिया करुन शेंद्रीय खत निर्मित्ती करणे सुरु आहे. यंदा शेतकºयांसाठी हे खत विक्रीस उपलब्ध केले जाणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक