शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

१५८६ ग्राहकांची वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:59 IST

सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या मोहिमेत ३ कोटी ४२ लाख रुपयांची वसूली करण्यात आली. धडक मोहिमेमुळे मात्र थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.वीज बिलांच्या थकबाकीमुळे महावितरणला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या हिंगोली मंडळाने थकबाकी वसुलीसाठी तीव्र मोहिम राबविण्यास सुरवात केली आहे. हिंगोली जिल्हयामध्ये कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील २८५७ वीजग्राहकांकडे १५ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील २५७५ वीजग्राहकांकडे ३ कोटी २० लक्ष रुपयांची थकबाकी आहे. पथदिव्यांच्या 16 वीजग्राहकांकडे २ कोटी २१ लक्ष तसेच २३८ पाणीपुरवठा योजनांकडे ९ कोटी ९७ लक्ष रुपये थकबाकी आहे. १ डिसेंबरपासून सुरु केलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईमध्ये मागील २६ दिवसांत ११५७ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तर ४२९ वीजग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदर मोहिमेत २ हजार ३४८ वीजग्राहकांकडुन ३ कोटी ४२ लाखांची वसुली करण्यात आली आहे. पुढील काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी आपल्या थकबाकीसह चालू महिन्याचे वीज देयक त्वरीत भरून घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात महावितरणकडून थकित वीजबिल धडक वसुली मोहीम सुरू आहे.वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या वीजदेयक भरणा केंद्र सोबतच मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकींगव्दारे, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, पेटीएम आदी सुविधा चोवीस तास उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिलाचा त्वरीत भरणा करावा व वीज पुरवठा खंडीत करण्याचे टाळावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाभरात वसूली पथकाद्वारे थकीत विजबिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या वीजदेयक भरणा केंद्रात भरून घेण्याचे आवाहन केले.ग्राहकांकडे वीजबिले थकल्यामुळे महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत बिलभरणा करावा असे आवाहन महावितरणकडून केले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण