शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

कृषी संजीवनीत शेतकऱ्यांचे १४ हजार अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST

हिंगोली : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला मंजुरीतील क्लिष्ट प्रक्रियेमुळे ...

हिंगोली : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला मंजुरीतील क्लिष्ट प्रक्रियेमुळे खीळ बसली आहे. तब्बल १४ हजार अर्ज मंजुरीसाठी पडून आहेत; तर स्थळ पाहणीत २० हजार अर्ज अडकले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात तीन टप्प्यांत २४० गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३९, दुसऱ्या टप्प्यात १२९, तर तिसऱ्या टप्प्यात ७२ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माहितीसाठी गावोगाव शेतीशाळाही घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना यात नेमका कोणत्या योजनांचा काय व कसा फायदा घेता येईल, याची माहिती ४२८ शेतीशाळांतून दिली. तसेच या योजनेत शेतकऱ्यांना असलेल्या अनुदानाचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

या योजनेत तसे आतापर्यंत ९४ हजार ५६१ अर्ज आले आहेत. मात्र यापैकी ३६ हजार ४९३ अर्जांचीच नोंदणी झाली आहे. यापैकी ३६ हजार अर्जांची पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र याला या योजनेसाठी नेमलेल्या समितीची मंजुरी आवश्यक असते. अशा मंजुरीत १४ हजार ७१४ अर्ज अडकून पडले आहेत, तर कृषी सहायकांनी स्थळ पाहणी करण्यासाठी २० हजार ३८८ अर्ज प्रलंबित आहेत. ३२१३ अर्ज तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांपर्यंत जाणाऱ्या अर्जांची संख्या अतिशय कमी असल्याचे दिसते. त्यातही तेथेही हे अर्ज प्रलंबित राहात असल्याने या योजनेतील कामांना खीळ बसली आहे.

शेतकऱ्यांना ही कामे मंजूर झाल्यानंतर ती करून त्यांनाच या कामांची देयके अपलोड करावी लागतात. अशा १० हजार ७५० कामांची देयके प्रलंबित आहेत; तर कृषी सहायकांनी मोका तपासणी करण्याची २४४९ कामे बाकी आहेत. लेखाधिकारी स्तरावर १८३, अंतिम मंजुरीसाठी २३९ कामांची देयके रखडली आहेत. आतापर्यंत १५ हजार ७१९ कामांना अनुदान वितरित झाले असून, ही रक्कम ४४ कोटी रुपये एवढी आहे. मुंबईच्या स्तरावरही आणखी ४८५ अर्ज प्रलंबित आहेत.

मृद व जलसंधारणाचीही तीच गत

मृद व जलसंधारणाची एकूण ४०६ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. १९.५२ कोटींची ही कामे आहेत. यापैकी ८.३० कोटींच्या २२१ कामांना तांत्रिक मंजुरी दिली; तर ५.३० कोटींच्या १५१ कामांची ई-निविदा निघाली आहे. या सर्व कामांचा कार्यारंभ आदेशही दिला. मात्र यातील १०९ कामेच पूर्ण झाली असून, यावर २.५२ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.