शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

वॉटरकप स्पर्धेत १३५ गावांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:47 IST

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.१३५ गावांनी स्पर्धेत भाग घेत असल्याचे स्वीकृतीपत्र पाणी फाऊंडेशनकडे दिले आहे. २७ गावात या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या. २५ गावात प्रत्येकी ५ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वरुड, टाकळगव्हाण ही दोन गावे १० जानेवारीपर्यंत स्पर्धेत भाग घेणार असल्याचे नागुरे यांनी सांगितले.प्रत्येक गावात ५ -प्रशिणार्थी निवडून त्यांना फाऊंडेशनच्या वतीने ४ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही स्पर्धा १०० गुणांची होणार आहे. यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शोषखड्डे तयार करणे, माती परीक्षण, रोपवाटिका, पाणी बचतीचे तंत्रज्ञान, आग पेटीमुक्त शिवार याला २५ गुण, श्रमदान-२०, यांत्रिकीकरण-२०, कामाच्या गुणवत्तेला १० गुण, पाण्याचे अंदाजपत्रक ५ गुण, जुन्या रचनेची दुरूस्ती त्यात विहीर पुनर्भरण, पाणलोट उपचार या कामांना राहणार आहेत. ३१ जानेवारीअखेर ११० गावात ग्रामसभा घेवून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. गावांनी सहभाग नोंदवावा, यासाठी पाणी फाऊंडेशनचे प्रणील नागरे, संदीप बेळे, भागवत कोटकर हे गावोगावी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यातील सर्व महसूली गावे यात सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या माहितीसाठी व जलसंधारणाच्या कामाची माहिती व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात दोनवेळा सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा ४५ दिवसांचा राहणार आहे. यात राज्य स्तरावर पहिले बक्षीस ७५ लाख, दुसरे ५० लाख तर तिसरे ४० लाख रुपये राहणार आहे. तालुका स्तरावर सर्वोतम कामगिरी करणाºया ग्रा.पं. ला १० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जलसंधारणाची सर्व कामे श्रमदानातून केली जाणार आहेत. राज्यातून दरवर्षी चांगली कामे करणारी टॉप १० गावे फाऊंडेशनच्या वतीने निवडली जातात.