शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरकप स्पर्धेत १३५ गावांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:47 IST

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.१३५ गावांनी स्पर्धेत भाग घेत असल्याचे स्वीकृतीपत्र पाणी फाऊंडेशनकडे दिले आहे. २७ गावात या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या. २५ गावात प्रत्येकी ५ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वरुड, टाकळगव्हाण ही दोन गावे १० जानेवारीपर्यंत स्पर्धेत भाग घेणार असल्याचे नागुरे यांनी सांगितले.प्रत्येक गावात ५ -प्रशिणार्थी निवडून त्यांना फाऊंडेशनच्या वतीने ४ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही स्पर्धा १०० गुणांची होणार आहे. यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शोषखड्डे तयार करणे, माती परीक्षण, रोपवाटिका, पाणी बचतीचे तंत्रज्ञान, आग पेटीमुक्त शिवार याला २५ गुण, श्रमदान-२०, यांत्रिकीकरण-२०, कामाच्या गुणवत्तेला १० गुण, पाण्याचे अंदाजपत्रक ५ गुण, जुन्या रचनेची दुरूस्ती त्यात विहीर पुनर्भरण, पाणलोट उपचार या कामांना राहणार आहेत. ३१ जानेवारीअखेर ११० गावात ग्रामसभा घेवून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. गावांनी सहभाग नोंदवावा, यासाठी पाणी फाऊंडेशनचे प्रणील नागरे, संदीप बेळे, भागवत कोटकर हे गावोगावी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यातील सर्व महसूली गावे यात सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या माहितीसाठी व जलसंधारणाच्या कामाची माहिती व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात दोनवेळा सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा ४५ दिवसांचा राहणार आहे. यात राज्य स्तरावर पहिले बक्षीस ७५ लाख, दुसरे ५० लाख तर तिसरे ४० लाख रुपये राहणार आहे. तालुका स्तरावर सर्वोतम कामगिरी करणाºया ग्रा.पं. ला १० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जलसंधारणाची सर्व कामे श्रमदानातून केली जाणार आहेत. राज्यातून दरवर्षी चांगली कामे करणारी टॉप १० गावे फाऊंडेशनच्या वतीने निवडली जातात.