शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

वॉटरकप स्पर्धेत १३५ गावांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:47 IST

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.१३५ गावांनी स्पर्धेत भाग घेत असल्याचे स्वीकृतीपत्र पाणी फाऊंडेशनकडे दिले आहे. २७ गावात या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या. २५ गावात प्रत्येकी ५ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वरुड, टाकळगव्हाण ही दोन गावे १० जानेवारीपर्यंत स्पर्धेत भाग घेणार असल्याचे नागुरे यांनी सांगितले.प्रत्येक गावात ५ -प्रशिणार्थी निवडून त्यांना फाऊंडेशनच्या वतीने ४ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही स्पर्धा १०० गुणांची होणार आहे. यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शोषखड्डे तयार करणे, माती परीक्षण, रोपवाटिका, पाणी बचतीचे तंत्रज्ञान, आग पेटीमुक्त शिवार याला २५ गुण, श्रमदान-२०, यांत्रिकीकरण-२०, कामाच्या गुणवत्तेला १० गुण, पाण्याचे अंदाजपत्रक ५ गुण, जुन्या रचनेची दुरूस्ती त्यात विहीर पुनर्भरण, पाणलोट उपचार या कामांना राहणार आहेत. ३१ जानेवारीअखेर ११० गावात ग्रामसभा घेवून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. गावांनी सहभाग नोंदवावा, यासाठी पाणी फाऊंडेशनचे प्रणील नागरे, संदीप बेळे, भागवत कोटकर हे गावोगावी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यातील सर्व महसूली गावे यात सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या माहितीसाठी व जलसंधारणाच्या कामाची माहिती व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात दोनवेळा सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा ४५ दिवसांचा राहणार आहे. यात राज्य स्तरावर पहिले बक्षीस ७५ लाख, दुसरे ५० लाख तर तिसरे ४० लाख रुपये राहणार आहे. तालुका स्तरावर सर्वोतम कामगिरी करणाºया ग्रा.पं. ला १० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जलसंधारणाची सर्व कामे श्रमदानातून केली जाणार आहेत. राज्यातून दरवर्षी चांगली कामे करणारी टॉप १० गावे फाऊंडेशनच्या वतीने निवडली जातात.