शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चोरी रोखण्यासाठी १३२ पोलीस ठाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:25 IST

दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे. त्यामुळे आता वीजचोरी करणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. ज्या ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, तेथील ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गृह विभागाने राज्यातील १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.या संदर्भाचे परिपत्रकही गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी काढले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील. मोठ्या शहरांमध्ये ५ पोलीस ठाण्यांना वीजचोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे ६ पोलीस ठाणे बंद करण्यात आले आहेत.वीजचोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड ४, ठाणे जिल्ह्यात १०, धुळे ३, हिंगोलीत ३, नांदेड ४ पोलीस ठाणे नाशिक ५, जालन्यात ३, परभणीत ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७ या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.आकडेवारी : राज्यभरातील ठाण्यांची संख्यापुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलढाणा २, चंद्रपुर ३, गडचिरोली २, गोंदिया ३, जळगाव ४, कोल्हापूर जिल्हयात २, नंदूरबार ३, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३,सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती नांदेड परिमंडळातर्फे देण्यात आली आहे. याबाबत जागृतीही केली जात आहे.कोणीही वीजचोरी करू नये, असे करताना आढळून आल्यास संबधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.