शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कौटुंबिक हिंसाचाराच्या जिल्ह्यात १२२५ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:53 IST

जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत.

दयाशील इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत.चार भिंतीच्या आत आजही महिलांवर होणारे अत्याचार कमी नाहीत. त्यामुळे आपल्याच घरात अनेक महिला असुरक्षित असल्याचे कौटुंबिक हिसांचाराच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक आणि गंभीर समस्या बनली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यातर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या एकत्रित माहितीच्या अहवालावरून सन २००६ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमअंतर्गत १२२५ प्रकरणे प्राप्त झाल्याची माहिती आहे. यापैकी न्यायालयात निकाली निघालेली प्रकरणे ३३५ आहेत. निकाली निघालेल्या प्रकरणात न्यायालयाने आदेशाची वर्गवारी केली. यामध्ये १७ पीडितांना संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर मुलांचा ताबा आदेश ६, नुकसान भरपाई आदेश १७, निवासाचे आदेश ९, अर्थसहाय्यचे आदेश ४८ दिले आहेत. तसेच यातील इतर प्रकरणे सामंजस्याने किंवा तडजोडीअंती मिटविण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत न्यायदंडाधिकारी हे पिडित महिलेस त्रास देणाºया पती किंवा इतर नातेवाईक (लाईव्ह ईन रिलेशिअनशीप) या तत्त्वानुसार एकत्र राहणारा पुरूष साथीदार अथवा त्याचे नातेवाईकांकडून शारीरिक, लैंगिक, आर्थिक आणि तोंडी किंवा भावनिक अत्याचाराने पीडित महिलांना निवासाच्या अधिकारासह सुरक्षिततेसाठी आदेश काढून संवैधानिक अधिकार सुरक्षित करू शकतात. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व नियम २००६ भारतात २६ आॅक्टोबर २००६ पासून लागू करण्यात आला आहे.महिलांना कुटुंबात व कुटुंबाहेरही विविध अत्याचाराला तोंड द्यावे लागते. या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात असून पीडितांचे समुपदेशन केले जाते.राज्यात ३७७४ संरक्षण अधिकारी कार्यरत४राज्यात ३७७४ संरक्षण अधिकारी कार्यरत आहेत. शासनाने राज्यातील सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी व विस्तार अधिकाºयांना संरक्षण अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात संरक्षण अधिकाºयांचे कार्यक्षेत्रही निश्चित करण्यात आलेले आहेत. एखाद्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेबाबत त्या कार्यक्षेत्रातील अधिकाºयांची माहिती हवी असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येतो.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी