शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:03 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

मागील दोन वर्षांपासून रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवघ्या दोन वर्षांत तब्बल रस्त्यावरील अपघातात २६० जणांचा बळी गेलेला असला तरीही जखमींची संख्या सर्वाधिक जास्त आहे. केवळ वेळेवर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आहेत. तर अनेक गोरगरीब रुग्णांना हिंगोली येथून नांदेडसह इतर रुग्णालयात रुग्णांना हलविण्यासाठीही ही रुग्णवाहिका अतिशय उपयेगाची ठरली आहे. विशेष करुन १०२ जननी शिशुच्या रुग्णवाहिकेला उतरती कळा आल्याने याच रुग्णवाहिकेवर गरोदरमांताची ने-आण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेही रुग्ण समाधानी आहेत.

मात्र एखाद्यावेळी गरोदर मातेला आणण्यासाठी तर कधी प्रसुती मातांना नेऊन सोडण्यासाठी रुग्णवाहिका गेल्यास, अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १०२ रुग्णवाहिकेचा ताण कमी करुन केवळ अपघातस्थळी जाण्यासाठीच या रुग्णवाहिकेचा वापर केल्यास खरोखरच अनेक रुग्णांना ही रुग्णवाहिका संजीवनी ठरणार आहे. सध्या दोन्हीकडेही रुग्णवाहिका धावत असल्याचे चित्र आहे. तर हिंगोलीतील यंत्राणाही रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत यंत्रणेला कडक सूचविले आहे. तर अनेकदा याबाबत तक्रार आल्यास स्वत: दखल घेवून संबंधितांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे कामाचा ताणजिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या १२ रूग्णवाहिका आहेत. प्रत्येक रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे तीन डॉक्टर असणे आवश्यक आहेत. परंतु १२ रूग्णवाहिकेवर केवळ २८ डॉक्टरच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रूग्णांची गैरसोय होऊ नये, वेळेत कॉल पूर्ण करता यावा यासाठी डॉक्टरांकडून नियोजन केले जाते. परंतु त्यामुळे मात्र अतिरिक्त कामाचा ताण येतो. लवकरच तीन डॉक्टरांची पदे भरली जाणार आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायतुल्ला खान यांनी सांगितले. तर १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वाहने दुरूस्तीस पाठविली आहेत. तर ६ रूग्णवाहिका वापराविना धूळ खात पडून आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंgovernment schemeसरकारी योजना