शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

१०५ बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

हिंगोली : प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जिल्ह्यात जवळपास १०५ एस.टी. बसेसला कोटिंग करण्यात आले आहे. वर्षातून चार ...

हिंगोली : प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जिल्ह्यात जवळपास १०५ एस.टी. बसेसला कोटिंग करण्यात आले आहे. वर्षातून चार वेळा बसेसला कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

२३ मार्च २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला असून, अजूनही एक-दोन रुग्ण रोजच आढळून येत आहेत. प्रवाशांना प्रवास करतेवेळेस कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून एस. टी. महामंडळाने २७ जुलै २०२१ रोजी बसेसला कोटिंग करण्याचा निर्णय घेतला. आजमितीस जिल्ह्यातील हिंगोली आगाराने ४०, वसमत आगाराने ४० आणि कळमनुरी आगाराने २५ बसेसला कोटिंग केले आहे. ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू नाहीत. प्रवासी खासगी वाहनांनी शहराच्या ठिकाणी येत आहेत. गावी जाताना जी बस मिळेल त्याने घर जवळ करीत आहेत. कोरोना संपला असे समजून अनेक प्रवासी मास्क न लावताच बिनधास्तपणे प्रवास करीत आहेत.

किती बसेसला कोटिंग?

हिंगोली ४०

वसमत ४०

कळमनुरी २५

वर्षातून चार वेळा कोटिंग...

अँटी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया काही जिल्ह्यांत पूर्ण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र अजून बाकी आहे. कंपनीचे प्रतिनिधी येऊन कोटिंग करून देत आहेत. वर्षातून चार वेळा हे कोटिंग केले जाईल, असे तांत्रिक विभागाचे पर्यवेक्षक सिद्धार्थ आझादे यांनी सांगितले.

बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही...

बसमध्ये एखादी बाधित व्यक्ती येऊन गेल्यानंतर धोका नाही; पण बाजूला कोणी बसले असेल तर प्रवाशांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. बाजूला बसलेली व्यक्ती बाधित आहे की नाही हे कोणालाच कळत नाही. बसमध्ये बसल्यानंतर अनेक प्रवासी मास्क घालत नाहीत. कोरोना संपला या आविर्भावात काहीजण पाहायला मिळत आहेत.

प्रवासी काय म्हणतात...

महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसेसला कोटिंग केले आहे. ग्रामीण भागातील बसेसला कोटिंग केले की नाही, हे मात्र कळायला मार्ग नाही. ग्रामीण भागातील बसेसला कोटिंग करणे महत्त्वाचे आहे.

-अनिल आढळकर, प्रवासी

लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करून चार महिने लोटले आहेत. अजूनही ग्रामीण भागातील बसेस सुरू केलेल्या नाहीत. कोरोनाचा धोका ओळखून ग्रामीण भागातील बसेसला कोटिंग करून प्रवाशांच्या सोयीकरिता महामंडळाने बसेस सुरू करणे गरजेचे आहे.

-मारोती कल्याणकर, प्रवासी

प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून महामंडळ बसेसला कोटिंग करीत आहेत. जवळपास १०५ बसेसला कोटिंग केले आहे. अजून काही बसेस कोटिंग करायच्या बाकी आहेत. कोटिंग केले तरी प्रवाशांनी प्रवास करतेवेळेस सामाजिक अंतर ठेवत मास्कचा पुरेपूर वापर करावा.

-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख