शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

World No Tobacco Day : भारतात वर्षभरात १० लक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण तंबाखू आहे....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 14:23 IST

३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त विशेष लेख..!

-Ravindra Moreएक मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो पूर्णत: पवित्र, व्यसनांपासून अलिप्त तसेच आपल्या बालपणाच्या मस्तीत जगत असतो. मात्र जेव्हा तो मोठा होतो, दुनियादारीला समजू लागतो, त्याच्या भोवताली काय सुरु आहे हे सर्व जाणतो, तेव्हा तो का समाजात पसरणाऱ्या वाईट गोष्टींचा स्वीकार करु लागतो आणि येथूनच तो आपल्या आयुष्याचा असा मार्ग निवडतो जो त्याला कायमचा आयुष्यातून उठवितो. मरणास काही तरी कारण असतं, मग ते तंबाखूचे किंवा दारुचे व्यसनही असू शकतं. तंबाखूमुळे जगामध्ये दर सहा सेकंदाला एक व्यक्ती दगावतो. भारतात वर्षभरात १० लक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण तंबाखू आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक व्यसनींचा मृत्यू कॅन्सर किंवा अल्पवयातच ह्रदयविकाराने होतो. शासनास तंबाखूमुळे होणाऱ्या होणाऱ्या व्याधींवरील खर्चाची रक्कम त्यावरील मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ८ ते १० पट अधिक आहे. ७० लक्ष भारतीयांच्या उपजिविकेचा प्रश्न इतका भयंकर आहे की, तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर खडगी भरणाऱ्याच्या पोटावर पाय देणेच शासनाला अवघड होऊन बसल्याचे दिसते. मग वर्षाला १० लक्ष लोकांचा जीव ह्या व्यसनामुळे जातोय ह्याच्या गांभिर्याचा केवळ आव आणला जातोय.अप्रत्यक्षपणे टोबॅको इंडस्ट्री लॉबिंग करुन तंबाखूबंदी होऊच देत नाही. त्यांच्या ताकदीला शह देण्यासाठी अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना तंबाखू विरोधी मोहिमेत सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यापासून ते थेट मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयातील सर्व वर्गांना ह्या संघटनांनी वेठीस धरले व तंबाखू विरोधी कायद्यांची प्रखरतेने अंमलबजावणी करण्यास भाग सुद्धा पाडले. गुटख्यापाठोपाठ सरसकट तंबाखूबंदीकडे सातत्याने वाटचाल सुरु आहे. त्याचेच फलीत म्हणून मागील दोन वर्षापासून या तंबाखू उत्पादनाचा व त्यामुळे मिळणाऱ्या कराचा ढासळता आलेख दृष्टिपथास येत आहे. त्याच बरोबर तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या मुख कर्करोगाच्या प्रमाणातही मागील दोन वर्षात घट नोंदवली गेली असल्याचे राष्ट्रीय कुटुंब कल्याण आढाव्यातून निदर्शनास आले आहे. (नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-४)महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर ग्रुपचे प्रमुख टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत प्रो. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी तंबाखू उच्चाटनाचा जणू विडाच उचलला आहे. तसेच तंबाखूवर पुर्णपणे जोपर्यंत बंदी येत नाही, तोपर्यंत सरकारच्या तंबाखूविषयी धोरणाला लक्ष करुन जनसामान्यांपर्यंत पोहचून तंबाखूची मागणीच संपेपर्यंत शांत बसायचे नाही हेच ठरविले आह. त्यांच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हास्तरावर किमान एकतरी वॉरिअर सक्रिय आहे. Also Read : ​​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक