शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

World No Tobacco Day : भारतात वर्षभरात १० लक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण तंबाखू आहे....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 14:23 IST

३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त विशेष लेख..!

-Ravindra Moreएक मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो पूर्णत: पवित्र, व्यसनांपासून अलिप्त तसेच आपल्या बालपणाच्या मस्तीत जगत असतो. मात्र जेव्हा तो मोठा होतो, दुनियादारीला समजू लागतो, त्याच्या भोवताली काय सुरु आहे हे सर्व जाणतो, तेव्हा तो का समाजात पसरणाऱ्या वाईट गोष्टींचा स्वीकार करु लागतो आणि येथूनच तो आपल्या आयुष्याचा असा मार्ग निवडतो जो त्याला कायमचा आयुष्यातून उठवितो. मरणास काही तरी कारण असतं, मग ते तंबाखूचे किंवा दारुचे व्यसनही असू शकतं. तंबाखूमुळे जगामध्ये दर सहा सेकंदाला एक व्यक्ती दगावतो. भारतात वर्षभरात १० लक्ष लोकांच्या मृत्यूचे कारण तंबाखू आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक व्यसनींचा मृत्यू कॅन्सर किंवा अल्पवयातच ह्रदयविकाराने होतो. शासनास तंबाखूमुळे होणाऱ्या होणाऱ्या व्याधींवरील खर्चाची रक्कम त्यावरील मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ८ ते १० पट अधिक आहे. ७० लक्ष भारतीयांच्या उपजिविकेचा प्रश्न इतका भयंकर आहे की, तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर खडगी भरणाऱ्याच्या पोटावर पाय देणेच शासनाला अवघड होऊन बसल्याचे दिसते. मग वर्षाला १० लक्ष लोकांचा जीव ह्या व्यसनामुळे जातोय ह्याच्या गांभिर्याचा केवळ आव आणला जातोय.अप्रत्यक्षपणे टोबॅको इंडस्ट्री लॉबिंग करुन तंबाखूबंदी होऊच देत नाही. त्यांच्या ताकदीला शह देण्यासाठी अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटना तंबाखू विरोधी मोहिमेत सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यापासून ते थेट मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयातील सर्व वर्गांना ह्या संघटनांनी वेठीस धरले व तंबाखू विरोधी कायद्यांची प्रखरतेने अंमलबजावणी करण्यास भाग सुद्धा पाडले. गुटख्यापाठोपाठ सरसकट तंबाखूबंदीकडे सातत्याने वाटचाल सुरु आहे. त्याचेच फलीत म्हणून मागील दोन वर्षापासून या तंबाखू उत्पादनाचा व त्यामुळे मिळणाऱ्या कराचा ढासळता आलेख दृष्टिपथास येत आहे. त्याच बरोबर तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या मुख कर्करोगाच्या प्रमाणातही मागील दोन वर्षात घट नोंदवली गेली असल्याचे राष्ट्रीय कुटुंब कल्याण आढाव्यातून निदर्शनास आले आहे. (नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे-४)महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर ग्रुपचे प्रमुख टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत प्रो. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी तंबाखू उच्चाटनाचा जणू विडाच उचलला आहे. तसेच तंबाखूवर पुर्णपणे जोपर्यंत बंदी येत नाही, तोपर्यंत सरकारच्या तंबाखूविषयी धोरणाला लक्ष करुन जनसामान्यांपर्यंत पोहचून तंबाखूची मागणीच संपेपर्यंत शांत बसायचे नाही हेच ठरविले आह. त्यांच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हास्तरावर किमान एकतरी वॉरिअर सक्रिय आहे. Also Read : ​​चरस-गांजापेक्षा ‘तंबाखू’ अधिक घातक