शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

भारताच्या दोन कफ सिरपबाबत WHO नं दिला मोठा इशारा! काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 17:53 IST

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे.

नवी दिल्ली-

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या (Marion Biotech) दोन कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. संघटनेनं हे दोन कफ सिरप लहान मुलांसाठी वापरले जाऊ नयेत असा सल्ला दिला आहे. WHO च्या माहितीनुसार हे दोन कफ सिरप गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाहीत आणि त्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली गेली पाहिजे. उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांच्या मृत्यूचं प्रकरण देखील याच कंपनीनं बनवलेल्या कफ सिरपशी संबंधित आहे. 

WHO नं जाहीर केलेल्या माहितीनुसार Ambronol सिरप आणि DOK-1 Max सिरपवर बाजारातील विक्री थांबवली गेली पाहिजे. ही दोन सिरपचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचं ऑफीस नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे. 

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांच्या मृत्यूची बाब लक्षात घेत दोन सिरपची चौकशी केली होती. ज्यात दोन्ही सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचं प्रमाण अधिक होतं जे लहान मुलांच्या मृत्यूचं कारण ठरलं असं सांगितलं जात आहे. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार श्वसनाशी निगडीत आजाराशी झुंज देणाऱ्या २१ लहान मुलांना या सिरपचं सेवन केलं होतं. ज्यातील १९ मुलांचा मृत्यू झाला होता. 

रॉयटर्सच्या माहितीनुसार आतापर्यंत मरीन कंपनीनं या सिरपबाबत सुरक्षा आणि गुणवत्तेबाबत डब्ल्यूएचओला कोणतीही गॅरंटी दिलेली नाही. उझबेकीस्तानमध्ये लहान मुलांच्या मृत्यूची माहिती समोर येताच भारताच्या आरोग्य मंत्रालयानं कंपनीच्या उत्पादनावर तातडीनं बंदी घातली होती. आता गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारनं या कंपनीचा परवानाच रद्द केला आहे. 

मरीन बायोटेक उझबेकिस्तानमध्ये २०१२ साली रजिस्टर्ड झालेली कंपनी आहे. त्याच वर्षी कंपनीनं आपल्या औषधांच्या विक्रीला सुरूवात केली होती. भारतात सध्या या कंपनीची औषधं विकली जात नाहीत. उझबेकिस्तानमध्ये १९ लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याआधी गाम्बियामध्येही कफ सिरपच्या सेवनामुळे ७० मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी गाम्बियाच्या संसदीय समितीनं या मृत्यूंचं खापर नवी दिल्ली स्थित मेडेन फार्मास्युटिकल्सनं तयार केलेल्या कफ सिरपवर फोडलं होतं. दरम्यान कंपनीनं औषधाच्या गुणवत्तेत कोणतीही गडबड झाल्याचा दावा केला होता. भारत सरकारनं त्यावेळी औषधाची तपासणी देखील केली होती आणि त्यात कोणतीही तृटी आठळली नव्हती.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटना