शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

जन्मत:च हृदयदोष असलेल्या मुलांचे आपण काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 05:54 IST

७ ते १४ फेब्रुवारी यादरम्यान जगभर जन्मजात हृदयदोषाविषयीचा जागृती सप्ताह पाळला जातो. यानिमित्ताने भारतातल्या परिस्थितीची चर्चा

डॉ. राजेश शर्मा

अध्यक्ष, पेडियाट्रिक कार्डियाक सोसायटी ऑफ इंडिया, हृदय शल्यविशारद

जन्मजात हृदयदोषाविषयी भारतात काय स्थिती आहे? आपल्या देशात शंभरामागे एका मुलात हा दोष आढळतो. त्यातल्या २० टक्क्यांवर उपचारांची गरज असते. इथल्या जन्मदरानुसार २४०००० मुले हा दोष घेऊन जन्मतात. अनुभवी बाल शल्यक्रिया विभागात त्यांच्यावर होणारे उपचार ९५ टक्के यशस्वी होतात. वेळीच उपचार झाले नाहीत तर मात्र वाढत्या वयात अडचणी उद्भवतात. हालचालींवर बंधने येतात. मोफत उपचार किंवा आर्थिक मदत करून सरकार याबाबतीत पुढाकार घेते. परंतु यातल्या बहुतेक योजना सरकारी इस्पितळात उपलव्ध आहेत. ‘एम्स’सारख्या ठिकाणी रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी असते. आयुष्मान किंवा राष्ट्रीय बाल सेवा कार्यक्रम खाजगी रुग्णालयाकडे उपलब्ध असला तरी सरकार देते त्याच्या दुप्पट शुल्क तेथे घेतले जाते. त्यांना अशा योजना नकोच असतात. तरी या आजारावरील उपचारात त्यांनी बरेच योगदान दिले आहे.

रुग्णाच्या पैशातून सगळे खर्च भागवायचे असल्याने तेथे दुप्पट, तिप्पट खर्च येतो. प्रतीक्षायादी जवळपास नसते. सरकारी योजनातून मिळणारी मदत गुंतागुंतीच्या आजारात पुरेशी नसते. तरी परवडत नसतानाही लोकांना इथली सेवा घ्यायची असते. ८० टक्के रुग्ण मुलांचा खर्च आईवडील करतात. कधी कधी तो आवाक्याबाहेर जाऊन ते कर्जबाजारीही होतात. भारत आता वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र होऊ पाहत आहे. पश्चिम किंवा पूर्वेकडील देशांपेक्षा इथले शुल्क कमीच असते. मात्र अनेक भारतीय पालकांना हा खर्च न झेपणारा असतो. भारतात वैद्यकीय विमा योजनांमध्ये अपवाद वगळता जन्मजात दोषांना संरक्षण नसते. श्रीमंतांना खर्च झेपतो. गरिबांकरिता दारिद्र्यरेषेखालील योजना असतात. करदाता मध्यमवर्ग मात्र वाऱ्यावर सोडला जातो. या वर्गाच्या मुलाना हे संरक्षण नको का? मोफत सेवा नाही तर विमा तरी! दुर्दैवाने जन्मजात दोष असणाऱ्या मुलाना आरोग्य विम्याचे कवच मिळत नाही.

जन्मजात दोष आधीपासून असतात असे गृहीत कसे धरले जाते? ते ठरवण्याची व्याख्या सदोष आहे. चाळीशीत मी विमा काढायला गेलो तर काही पूर्व चाचण्या करतात, काही नाही करत. मला मधुमेह असेल तर हप्ता वाढेल, पण अँजिओग्राम न काढता मला विमा मिळतो. मला आधीपासून हृद्रोग असू शकतो तरी! तो काही वर्षभरात होत नाही. मग जन्मजात दोषांना का नकार दिला जातो? गरिबाला सरकारने मदत दिली तर त्याला फायदा होतो हे कर्नाटकात ‘यशस्विनी’ या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विमा योजनेने दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंब मासिक ५ रुपये भरते, सरकार तेवढीच रक्कम देते. गर्भार  महिलांसाठी अशी योजना राबवली तर दोष असणारी कमीच मुले जन्मत असल्याने विमा कंपन्यांचे नुकसान होणार नाही.

भारतात  रोज सुमारे ७० हजार मुले जन्मतात. तुम्ही सर्व अवयव ठीकठाक घेऊन जन्मला नाहीत आणि पालक गरीब असतील तर सरकारी रुग्णालयातील प्रतीक्षायादी वाढणारच. मात्र ९७ टक्के लोकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते.बचावाची ताकद नसलेल्या अतिदुर्बलांना कसे वागवले जाते यावर समाजाचा पोत कळतो. पात्रतेच्या अनेक वर्गवाऱ्या आपण केल्या, पण जन्मजात व्यंग असलेल्या मुलांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. ‘अतिथी देवो भव’ म्हणणाऱ्या या महान संस्कृतीत नवपरिणीत जोडप्याला मिळणाऱ्या मूल्यवान भेटीकडे दुर्लक्ष झाले. व्यंग घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांना पाठबळ न देण्याची अनैतिक, लाजिरवाणी प्रथा संपवण्याची, त्यांना न्याय देण्याची वेळ आली आहे. आरोग्याचा मूलभूत हक्क आणि सुविधांच्या संदर्भात कोणालाही वगळणे केवळ अमानुष आहे.