शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

दोन जेवणातील अंतर किती हवे?; डॉक्टरांचा 'हा' सल्ला ऐका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 20:26 IST

पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच

धावपळीच्या युगात अनेकांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्षच केले आहे. विशेषत: ज्यांचे अधिक काळ बैठे कामे आहे, त्यांना बैठे कामांमुळे पाठदुखी, कंबरदुखी, डोळ्यांचे आजार, आदी विविध आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठे काम असणाऱ्यांनी काही काळ खुर्चीवरून उठून इतरत्र फिरणे गरजेचे आहे.

पाऊण तासापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी बसून काम नकोच

अधिक बैठे काम असणाऱ्यांनी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. किमान चार तास बैठे काम झाल्यानंतर खुर्चीवरून उठून इतर ॲक्टिव्हिटी करावी. त्यानंतर काम करावे. काही त्रास होत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत. - डाॅ. आशिष राठोड

झोप किती तास हवी?

मानवी शरीराला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. वयानुसार झोपेचे प्रमाण हे ठरलेले असते. विशेषत: युवकांनी, काम करणाऱ्या व्यक्तींनी सहा ते आठ तासांच्या मध्ये झोप घ्यावी. नियमित लवकर झोपून लवकर उठल्याचा अधिक लाभ होतो. दुपारी घेतली जाणारी अधिकची झोपही टाळावी. शरीराला आवश्यक प्रमाणातील झोपेसोबतच पौष्टिक अन्नही तितकेच महत्त्वाचे आहे. डॉ. प्रीतेश भक्कड

दोन जेवणातील अंतर किती हवे?

जेवण चांगले पचण्यासाठी चार ते पाच तासांचे अंतर गरजेचे आहे. दोन जेवणातील हे अंतर अधिक जास्त किंवा कमी असू नये. आम्लपित्ताचा त्रास होईल इतक्याही अधिक प्रमाणामध्ये जेवण करू नये. रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान तीन तासांच्या अगाेदर करावे. रात्री उशिरा जेवणे अयोग्य आहे. - डॉ. व्ही. व्ही. पिंगळे

सकाळी उठल्या उठल्या चहापेक्षा ताज्या फळांचा रस घ्या

अधिक प्रमाणात चहाचे सेवन हे मानवी शरीरास घातक आहे. त्यामुळे सकाळी शक्यतो फळे खावीत. फळांचा रस घेताना त्यात अधिक प्रमाणात साखर टाकणे टाळावे. रसामध्ये बर्फ टाकून पिणेही चुकीचे आहे. फळे ही शरीरास लाभदायक असतात. - डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक

टॅग्स :docterडॉक्टर