शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

कितीही पौष्टिक पदार्थ खा, पण पाण्याची सर कशालाच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:41 IST

पाण्याइतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही. तुमचं आयुष्याच ते पाणीदार करून टाकतं.. वाचा या दहा गोष्टी..

ठळक मुद्देशरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी उपयुक्त.पाणी आपला मूडही ठेवतं चांगला.पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते.श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होईल दूर

- मयूर पठाडेरोज किती पाणी आपण प्यायला पाहिजे? कोणी सांगतं सहा ग्लास, कोणी म्हणतं सात, कोणी आठ.. डॉक्टरही काही सांगतात. कोणी म्हणतं, असं काही नाही. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जास्तही नाही आणि कमीही नाही.. काही जण तर सांगतात, जास्त पाणी उलट पिऊच नये. नाहीतर तुमची तब्येत कधीच सुधारणार नाही. असेच राहाल तुम्ही किरकाडे..मग नेमकं रोज पाणी प्यायचं तरी किती?जाऊ द्या.. ते आपण त्या त्या व्यक्तीवरच सोडू. नाहीतर इथेच भांडणं व्हायला लागतील.पाणी किती प्या, हा जरी प्रश्न असला तरी पाणी पिऊच नका, असं आजवर कोणीही म्हटलेलं नाही. आपल्या शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठीही पाणी अत्यावश्यक आहे.मग या पाण्याचाच आपण विचार करू.

काय काय फायदे आहेत पाण्याचे?१- पाण्यामुळे आपला थकवा दूर होतो. थकलेले असल्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी पितो आणि ताजंजवानं वाटायला लागतं ते यामुळेच.२- पाण्यामुळे आपला मूडही चांगला राहातो. मूड स्विंग टळतात.३- डोकेदुखी आणि अर्धशिशीसारख्या प्रकरांवर पाण्याचा चांगला उपयोग होतो.४- अपचन होणं, बद्धकोष्ठता यासारख्या विकारांवरही पाणी उत्तम विरेचक म्हणून काम करतं.५- वजन कमी करण्यासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्या साºयांना माहीतच आहे.६- आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त ठरतं. घाम आणि लघवीवाटे हे विषारी घटक बाहेर पडतात.७- आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठीही पाणी खूपच उपयुक्त आहे.८- आपल्या त्वचेलाही पाण्याची गरज असते. पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते. ती कोरडी पडत नाही.९- तुम्ही जर मद्यप्राशन करणारे असाल, किंवा केलेलं असलं तर हॅँगओव्हर उतरण्यासाठीही पाण्याचा चांगला उपयोग होतो. पटकन रिकव्हरी मिळते.१०- अनेकांना श्वास दुर्गंधीचा त्रास असतो. त्यांच्या श्वासातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्यांच्या जवळपास उभं राहाणंही लोकं टाळतात. श्वासाच्या दुर्गंधीच्या त्रासाची पाण्यामुळे सुटका होऊ शकते.