शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

कितीही पौष्टिक पदार्थ खा, पण पाण्याची सर कशालाच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:41 IST

पाण्याइतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही. तुमचं आयुष्याच ते पाणीदार करून टाकतं.. वाचा या दहा गोष्टी..

ठळक मुद्देशरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी उपयुक्त.पाणी आपला मूडही ठेवतं चांगला.पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते.श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होईल दूर

- मयूर पठाडेरोज किती पाणी आपण प्यायला पाहिजे? कोणी सांगतं सहा ग्लास, कोणी म्हणतं सात, कोणी आठ.. डॉक्टरही काही सांगतात. कोणी म्हणतं, असं काही नाही. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जास्तही नाही आणि कमीही नाही.. काही जण तर सांगतात, जास्त पाणी उलट पिऊच नये. नाहीतर तुमची तब्येत कधीच सुधारणार नाही. असेच राहाल तुम्ही किरकाडे..मग नेमकं रोज पाणी प्यायचं तरी किती?जाऊ द्या.. ते आपण त्या त्या व्यक्तीवरच सोडू. नाहीतर इथेच भांडणं व्हायला लागतील.पाणी किती प्या, हा जरी प्रश्न असला तरी पाणी पिऊच नका, असं आजवर कोणीही म्हटलेलं नाही. आपल्या शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठीही पाणी अत्यावश्यक आहे.मग या पाण्याचाच आपण विचार करू.

काय काय फायदे आहेत पाण्याचे?१- पाण्यामुळे आपला थकवा दूर होतो. थकलेले असल्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी पितो आणि ताजंजवानं वाटायला लागतं ते यामुळेच.२- पाण्यामुळे आपला मूडही चांगला राहातो. मूड स्विंग टळतात.३- डोकेदुखी आणि अर्धशिशीसारख्या प्रकरांवर पाण्याचा चांगला उपयोग होतो.४- अपचन होणं, बद्धकोष्ठता यासारख्या विकारांवरही पाणी उत्तम विरेचक म्हणून काम करतं.५- वजन कमी करण्यासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्या साºयांना माहीतच आहे.६- आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त ठरतं. घाम आणि लघवीवाटे हे विषारी घटक बाहेर पडतात.७- आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठीही पाणी खूपच उपयुक्त आहे.८- आपल्या त्वचेलाही पाण्याची गरज असते. पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते. ती कोरडी पडत नाही.९- तुम्ही जर मद्यप्राशन करणारे असाल, किंवा केलेलं असलं तर हॅँगओव्हर उतरण्यासाठीही पाण्याचा चांगला उपयोग होतो. पटकन रिकव्हरी मिळते.१०- अनेकांना श्वास दुर्गंधीचा त्रास असतो. त्यांच्या श्वासातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्यांच्या जवळपास उभं राहाणंही लोकं टाळतात. श्वासाच्या दुर्गंधीच्या त्रासाची पाण्यामुळे सुटका होऊ शकते.