शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कितीही पौष्टिक पदार्थ खा, पण पाण्याची सर कशालाच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:41 IST

पाण्याइतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही. तुमचं आयुष्याच ते पाणीदार करून टाकतं.. वाचा या दहा गोष्टी..

ठळक मुद्देशरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी उपयुक्त.पाणी आपला मूडही ठेवतं चांगला.पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते.श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होईल दूर

- मयूर पठाडेरोज किती पाणी आपण प्यायला पाहिजे? कोणी सांगतं सहा ग्लास, कोणी म्हणतं सात, कोणी आठ.. डॉक्टरही काही सांगतात. कोणी म्हणतं, असं काही नाही. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जास्तही नाही आणि कमीही नाही.. काही जण तर सांगतात, जास्त पाणी उलट पिऊच नये. नाहीतर तुमची तब्येत कधीच सुधारणार नाही. असेच राहाल तुम्ही किरकाडे..मग नेमकं रोज पाणी प्यायचं तरी किती?जाऊ द्या.. ते आपण त्या त्या व्यक्तीवरच सोडू. नाहीतर इथेच भांडणं व्हायला लागतील.पाणी किती प्या, हा जरी प्रश्न असला तरी पाणी पिऊच नका, असं आजवर कोणीही म्हटलेलं नाही. आपल्या शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठीही पाणी अत्यावश्यक आहे.मग या पाण्याचाच आपण विचार करू.

काय काय फायदे आहेत पाण्याचे?१- पाण्यामुळे आपला थकवा दूर होतो. थकलेले असल्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी पितो आणि ताजंजवानं वाटायला लागतं ते यामुळेच.२- पाण्यामुळे आपला मूडही चांगला राहातो. मूड स्विंग टळतात.३- डोकेदुखी आणि अर्धशिशीसारख्या प्रकरांवर पाण्याचा चांगला उपयोग होतो.४- अपचन होणं, बद्धकोष्ठता यासारख्या विकारांवरही पाणी उत्तम विरेचक म्हणून काम करतं.५- वजन कमी करण्यासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्या साºयांना माहीतच आहे.६- आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त ठरतं. घाम आणि लघवीवाटे हे विषारी घटक बाहेर पडतात.७- आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठीही पाणी खूपच उपयुक्त आहे.८- आपल्या त्वचेलाही पाण्याची गरज असते. पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते. ती कोरडी पडत नाही.९- तुम्ही जर मद्यप्राशन करणारे असाल, किंवा केलेलं असलं तर हॅँगओव्हर उतरण्यासाठीही पाण्याचा चांगला उपयोग होतो. पटकन रिकव्हरी मिळते.१०- अनेकांना श्वास दुर्गंधीचा त्रास असतो. त्यांच्या श्वासातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्यांच्या जवळपास उभं राहाणंही लोकं टाळतात. श्वासाच्या दुर्गंधीच्या त्रासाची पाण्यामुळे सुटका होऊ शकते.