शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

By स्नेहा मोरे | Updated: December 26, 2022 09:18 IST

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे.

स्नेहा मोरे, प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे केंद्राने घेतलेल्या मिश्र पॅथीसंदर्भात वैद्यकीय शाखेच्या विविध तज्ज्ञांमध्ये असणारी संभ्रमावस्था बाजूला सारून तटस्थ राहत चिकित्सकपणे निर्णय घेण्याची गरज आहे. या सगळ्या पॅथींच्या वादात रुग्णाचा जीव मोलाचा आहे, याची जाणीव वैद्यकशास्त्राने ठेवली पाहिजे. सर्व पॅथींच्या डॉक्टरांमध्ये समन्वय, सहकार्य, सुसंवाद निर्माण करून, सकारात्मक कार्य करण्याची नितांत गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा लढा आयुर्वेद, आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधात नसून, वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनविल्या जाणाऱ्या ‘मिक्सोपथी’ विरोधात आहे. 

आयुर्वेदातील ॲलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचीन आणि महान वैद्यकीय शाखेचा विकास खुंटवेल आणि त्याचे अस्तित्व नाहीसे करू शकेल. आधुनिक वैद्यकीय सर्जन हा शरीरशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो. याची तुलना आयुर्वेद अभ्यासक्रमाशी करता येणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने यासंबंधीचा निर्णय मागे घ्यावा. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीतजास्त उपयोग कसा होईल, यावर सरकारने भर द्यावा, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ.जयेश लेले यांनी घेतली आहे. 

मिश्र चिकित्सा पद्धतीला (संयुक्त उपचार पद्धती) होणारा विरोध हा सर्वस्वी अयोग्यच आहे. मिश्र चिकित्सा पद्धतीमुळे रुग्णांचा फायदाच होणार आहे. प्रत्येक चिकित्सा पद्धतीची काही बलस्थाने असतात. काही कमतरताही असतात.  रुग्णांची चिकित्सा करीत असताना विविध पॅथींमधील बलस्थाने आणि कमतरता, औषधे आणि सोईसुविधांची उपलब्धता या सर्व बाबतीत समग्र विचार करून, मिश्र चिकित्सापद्धतीमुळे रुग्णांना परिपूर्ण उपचार पद्धती उपलब्ध होत असते. वैद्यक परिषदांनी निर्धारित केलेल्या व सरकारने राजपत्रात प्रकाशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार ॲलोपॅथी व आयुर्वेद यांचे परिपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर, आयुर्वेदाच्या पदवीधरांनी त्या ज्ञानाचा रुग्णसेवेकरिता उपयोग करणे ही रुग्णांची फसवणूक होऊ शकत नाही. याउलट ‘मिक्सोपॅथी’सारख्या भ्रामक शब्दांचा उपयोग करीत निष्कारण रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण करणे यालाच फसवणूक म्हणावी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे डॉ.आशुतोष गुप्ता यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या होमिओपॅथीच्या परिषदेवर नियुक्त झालेले होमिओपॅथी फिजिशियन आणि फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ.जसवंत पाटील यांनी सांगितले की, मिश्रपॅथी  संदर्भात वाद न घालता, शासनाच्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून संशोधन केले पाहिजे. येत्या काळात होमिओपॅथीच्या परिषदेच्या माध्यमातून मिश्रपॅथीविषयी संशोधन केले जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्य