शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

By स्नेहा मोरे | Updated: December 26, 2022 09:18 IST

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे.

स्नेहा मोरे, प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे केंद्राने घेतलेल्या मिश्र पॅथीसंदर्भात वैद्यकीय शाखेच्या विविध तज्ज्ञांमध्ये असणारी संभ्रमावस्था बाजूला सारून तटस्थ राहत चिकित्सकपणे निर्णय घेण्याची गरज आहे. या सगळ्या पॅथींच्या वादात रुग्णाचा जीव मोलाचा आहे, याची जाणीव वैद्यकशास्त्राने ठेवली पाहिजे. सर्व पॅथींच्या डॉक्टरांमध्ये समन्वय, सहकार्य, सुसंवाद निर्माण करून, सकारात्मक कार्य करण्याची नितांत गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा लढा आयुर्वेद, आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधात नसून, वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनविल्या जाणाऱ्या ‘मिक्सोपथी’ विरोधात आहे. 

आयुर्वेदातील ॲलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचीन आणि महान वैद्यकीय शाखेचा विकास खुंटवेल आणि त्याचे अस्तित्व नाहीसे करू शकेल. आधुनिक वैद्यकीय सर्जन हा शरीरशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो. याची तुलना आयुर्वेद अभ्यासक्रमाशी करता येणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने यासंबंधीचा निर्णय मागे घ्यावा. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीतजास्त उपयोग कसा होईल, यावर सरकारने भर द्यावा, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ.जयेश लेले यांनी घेतली आहे. 

मिश्र चिकित्सा पद्धतीला (संयुक्त उपचार पद्धती) होणारा विरोध हा सर्वस्वी अयोग्यच आहे. मिश्र चिकित्सा पद्धतीमुळे रुग्णांचा फायदाच होणार आहे. प्रत्येक चिकित्सा पद्धतीची काही बलस्थाने असतात. काही कमतरताही असतात.  रुग्णांची चिकित्सा करीत असताना विविध पॅथींमधील बलस्थाने आणि कमतरता, औषधे आणि सोईसुविधांची उपलब्धता या सर्व बाबतीत समग्र विचार करून, मिश्र चिकित्सापद्धतीमुळे रुग्णांना परिपूर्ण उपचार पद्धती उपलब्ध होत असते. वैद्यक परिषदांनी निर्धारित केलेल्या व सरकारने राजपत्रात प्रकाशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार ॲलोपॅथी व आयुर्वेद यांचे परिपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर, आयुर्वेदाच्या पदवीधरांनी त्या ज्ञानाचा रुग्णसेवेकरिता उपयोग करणे ही रुग्णांची फसवणूक होऊ शकत नाही. याउलट ‘मिक्सोपॅथी’सारख्या भ्रामक शब्दांचा उपयोग करीत निष्कारण रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण करणे यालाच फसवणूक म्हणावी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे डॉ.आशुतोष गुप्ता यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या होमिओपॅथीच्या परिषदेवर नियुक्त झालेले होमिओपॅथी फिजिशियन आणि फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ.जसवंत पाटील यांनी सांगितले की, मिश्रपॅथी  संदर्भात वाद न घालता, शासनाच्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून संशोधन केले पाहिजे. येत्या काळात होमिओपॅथीच्या परिषदेच्या माध्यमातून मिश्रपॅथीविषयी संशोधन केले जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Healthआरोग्य