शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिकुनगुनियानंतर ३ महिने काळजी घ्या, अन्यथा मृत्यूचा असतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 09:58 IST

लॅन्सेटमध्ये संशोधन प्रसिद्ध

नवी दिल्ली : चिकुनगुनिया विषाणूची लागण झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यानंतर १० ते १५ दिवस नव्हे, तर तीन महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका असतो, असे नव्या अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

‘द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस’ या नियतकालिकामध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो डासांनी चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. या आजाराला सामान्यतः पिवळा ताप असेही म्हणतात.

संशोधक म्हणतात...बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात, पण तरीही चिकुनगुनिया हा आजार घातक ठरू शकतो. या संसर्गाची बहुतेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, परंतु २०२३ मध्ये जगभरात अंदाजे पाच लाख जणांना चिकुनगुनिया झाला, तर ४०० पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला.ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) चे प्राध्यापक आणि अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक ॲनी दा पायक्साओ क्रूझ म्हणाले की, १० कोटी ब्राझीलमधील नागरिकांच्या डेटाचा वापर करून संशोधकांनी चिकुनगुनियाच्या सुमारे दीड लाख प्रकरणांचे विश्लेषण केले. 

निष्कर्ष काय? लोकांना तीव्र संसर्गाचा कालावधी संपल्यानंतरही गुंतागुंत होण्याचा धोका तीव्र संसर्गाचा कालावधी लक्षणे दिसल्यानंतर १४ दिवसांचा असतो.पहिल्या आठवड्यात संक्रमित व्यक्तीचा मृत्यूचा धोका दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत आठ पटीने जास्त असतो. संक्रमित व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत गुंतागुंत होण्याचा धोका दुप्पट असतो.

चिकुनगुनिया का वाढतोय? हवामानातील बदल, शहरीकरण आणि वेगाने वाढणाऱ्या मानवी कारणांमुळे एडिसजन्य आजार वाढून इतर भागात पसरण्याचा धोका आहे. 

उपचार काय? विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली होती.