शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 13:40 IST

आज संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. विशेषत: रिचार्ज, लाईट बिल, पैसे ट्रान्सफर, सोशल मीडिया, इंटरनेट आदींचा वापरासाठीही स्मार्ट फोनच उपयोगी पडत आहे.

आज संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. विशेषत: रिचार्ज, लाईट बिल, पैसे ट्रान्सफर, सोशल मीडिया, इंटरनेट आदींचा वापरासाठीही स्मार्ट फोनच उपयोगी पडत आहे. मात्र स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्यासाठी घातक असल्याचे निदर्शनास आले आहे. सातत्याने मोबाइलवर गुंतून राहणो शरीर आणि मनाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. शिवाय स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला असल्याचेही म्हटले आहे. याचा सर्वांत अधिक धोका तरुणांना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सतत चार वर्षे दररोज 3क् मिनिटांपेक्षा अधिक वेळ फोनवर बोलल्याने श्रवणशक्ती तर क्षीण होते, तसेच, दृष्टीवरही परिणाम होतो.  3 ते 35 वयोगटातील व्यक्तींनी स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन आदी मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचे प्रमाण 4 % टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर करणा:यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या किरणोत्सर्गाचा परिणाम लहान मुलं आणि तरुणांवर लवकर होतो.     लहान मुलांच्या डोक्याची कवयी अतिशय पातळ असल्याने त्यामधून किरणो सहज आत जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. बहुतांश तरुण इअरफोनचाही जास्त वापर करतात. आपण जर 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाणी ऐकली तर बहिरेपणाला आमंत्रण देण्याचे लक्षण आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.  अधिकाधिक वेळ इंटरनेट सफरिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणा:यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय. मुलामुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा आदी शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात. चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ हेत असून, मोतिबिंदूचे प्रमाण वाढत आहे. सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणा:या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी निर्माण होत आहेत.