शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

‘जंक फूडमधून लहानग्यांना अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जीचा धोका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:55 IST

लहानग्यांच्या आहारशैलीतून जंकफूडला बाद केले पाहिजे.

मुंबई : लहानग्यांमध्ये जंकफूडची निर्माण होत असलेली आवड ही घातक ठरण्याची शक्यता आहे. जंकफूडचा मुलांचा आग्रह पुरविला गेल्यास व आठवड्यातून त्याचे त्यांच्याकडून तीनदा सेवन झाल्यास लहान मुलांसाठी ते अधिकच हानिकारक ठरणार असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, मायक्रोवेव्ह आणि तळलेल्या पदार्थांचे सातत्याने सेवन केल्यास, त्यातून लहानग्यांना अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जीचा धोकाही संभावतो, असे निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे.

लहानग्यांच्या आहारशैलीतून जंकफूडला बाद केले पाहिजे. अशा पद्धतीच्या पदार्थांमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम होत आहे. अल्पवयीन मुलांनी आठवड्यात तीनदा याचे सेवन केल्यास, त्यांच्यातील प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यताही अधिक असते, असे आहारतज्ज्ञ सोनिया शहा यांनी सांगितले. जंकफूडमधील फॅट्समुळे जंकफूडचे व्यसन लागते. हे व्यसन लागल्यानंतर आहारात बदल करणेही अनेकांना कठीण होत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे, तसेच या गोष्टींमुळे सतत खाण्याची इच्छा होते आणि जंक फूड खावे, असेच वाटते. त्यामुळे शरीराला गरज नसतानाही मीठ, साखर आणि फॅट शरीरात जातात. त्यामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचेही संशोधकांनी अहवालात स्पष्ट केले आहे.आहारशैलीत बदल करण्याची गरज-आहारतज्ज्ञआहारतज्ज्ञ डॉ.कल्पिता ननावरे यांनी सांगितले की, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर पोट दुखणे, जुलाब लागणे, अंगावर रॅश येणे, सर्दी, खोकला, धाप, तोच पदार्थ पुन्हा खाल्ल्यावर पुन्हा तीच लक्षणे दिसत असल्यास, त्या अन्नपदाथार्ची अ‍ॅलर्जी असू शकते. गेल्या काही वर्षांत ६ ते १२ वयोगटांतील लहानग्यांमध्ये जंकफूडच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे, ते नियंत्रित केले पाहिजे.