शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

ही आहे परफेक्ट ‘लाईफस्टाईल’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:35 IST

आजच्या धावपळीच्या युगात कुणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही.

आजच्या धावपळीच्या युगात कुणाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे आजारपण, शारीरिक व्याधी तसेच अकाली म्हातारपण अशा समस्यांना सामोरे जावे लागते. आणि ज्यावेळी ह्या समस्या आपल्याला जडतात त्यावेळी मात्र आपल्या हातातून वेळच निघून गेलेली असते. मात्र योग्यवेळी राहणीमानात सुधारणा करून आपल्या जीवनशैलीत खालील गोष्टी अंगीकारल्या तर नक्कीच आपण कायमस्वरुपी तारुण्याचा अनुभव घ्याल..* अति जागरणामुळे लवकर वार्धक्य येते म्हणून रात्री जास्तीत जास्त उशीर म्हणजे दहा वाजता झोपा.* लवकर उठणे आरोग्यदायी असल्याने सकाळी ५.०० ते ५.३० दरम्यान किंवा त्या आधी उठा.* दात घासण्याआधी एक लिटर गरम पाणी लिंबू पिळून हळू हळू एकेक घोट करून प्या.* किमान दहा मिनिटे वज्रासनात बसा.* किमान १० किंवा जास्तीत जास्त २५ सूर्यनमस्कार हळुवारपणे घाला.* प्राणायामाचे अनन्य साधारण महत्त्व असून, फक्त १० मिनिटे करा.* रोज एक आवळा किंवा आवळ्याचा रस आवर्जून घ्या.* सकाळी ८.३० ते ९.०० दरम्यान भरपूर नाष्टा करा. यावेळी जेवण केले तर उत्तमच. * दुुपारी १२.३० ते १.०० दरम्यान हलके जेवण करा. * संध्याकाळी ७.०० ते ७.३० दरम्यान एकदम कमी जेवण.* कंपल्सरी १५ मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे आवश्यक.* १० वाजता एक ग्लास गरम पाणी पिणे आणि लगेच झोपावे. अशी घ्या काळजी * रात्री जेवणानंतर जास्त चालणे टाळावे. फक्त शतपावली करावी. * जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे, पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.* रोज कमीत कमी ३ लिटर पाणी प्यावे.* फक्त सीझनल फळेच खावीत.* कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स घेऊ नये. आरोग्यासाठी खूपच घातक आहेत. * डाव्या कुशीवर झोपावे.* सकाळी पाच मिनिटे तरी उन्हात उभे राहावे. * पोट बिघडणार नाही याची काळजी घ्या. कारण पोटाच्या विकारानेच आजारपण येते.