शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास पावसाळी टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 13:39 IST

पावसाळ्यात अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. निष्काळजीपणा तुमच्या अंगावर येऊ शकतो.

मुंबई : पावसाची चाहूल लागताच प्रत्येकाचीच वेगळी लगबग सुरू होते. कुणी नवीन छत्री खरेदी करतात, कुणी रेनकोट तर कुणी पावसाळ्यासाठी स्पेशल शूज-चप्पल…पावसाळा हा अनेक रोगांनाही आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे इतर ॠतूंपेक्षा पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सर्दी-खोकला तर पावसाळ्यात एक सामान्य गोष्ट होऊन बसते. नोकरदार वर्गाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसतो. पावसाच्या सरी अंगावर घेण्यात आनंद जरी मिळत असला तरी त्याचे तोटेही अनेक आहेत. पावसाळ्यात अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. निष्काळजीपणा तुमच्या अंगावर येऊ शकतो.

पावसाळ्यात खाण्यापिण्यासोबत इतरही अशा गोष्टी आहेत ज्यात काळजी तुम्ही घेतली पाहिजे. खासकरून ऑफिसला जाणा-यांसाठी आम्ही आज काही पावसाळी स्पेशल टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यात आम्ही तुम्ही पावसात बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सांगणार आहोत. पावसाच्या आनंदाच्या भरात उगाच स्वत:ची फजिती करून घेण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी…नाही का..?

* पावसात ऑफिसला जाणा-यांची नेहमीच सर्वात जास्त फजिती होते. ऑफिससाठी तुम्ही व्यवस्थित इस्त्रीचे कपडे घालून तयार झाल्यावर नेमका पाऊस आल्यास सगळंच विस्कटीत होतं. अशात शक्य असल्यास तुमचे ऑफिसचे कपडे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी करू शकता. ऑफिसला गेल्यावर चेन्ज करू शकता.

* पावसात तुम्ही जराही भिजले तर सर्दी-खोकला होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडण्याआधी न विसरता आपल्या बॅगमध्ये एक टॉवेल किंवा नॅपकिन ठेवा. जेणेकरुन तुम्ही केस आणि अंग कोरडे करू शकाल.

* पावसाळ्यात घराबाहेर पडताना बॅगमध्ये कपड्यांचा एक जोड असायला पाहिजे. पावसात भिजलेल्या कपड्यांवर तुम्ही दिवस काढणार असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकतं. असे केल्यास ताप, सर्दी खोकला येण्याची शक्यता अधिक असते. 

* पावसाळ्यात उलटसुलट खाणे जसे घातक आहे, तसे अस्वच्छ पाणीही त्यापेक्षा घातक आहे. बाहेरचं पाणी पिणे शक्यतो टाळा. या दिवसात पावसाच्या पाण्यात रोगजंतू अधिक असतात त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यामुळे बाहेर पडताना घरूनच पाण्याची एक बाटली सोबत घ्या.

* पावसाळ्यात बाहेर पडताना एक प्लॅस्टीकची बॅग आवर्जून सोबत ठेवा. तुम्ही बाहेर पडताना पाऊस थांबला असला तरी तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे तुमचा मोबाईल,  पाकिट, तुमची रेल्वे-बसची पास भिजण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाहेर तुमचीच फजिती अधिक होऊ शकते. आता मोबाईल पाण्यात भिजल्यावर किती महागात पडू शकतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे.

* या दिवसात जसं बाहेरचं पाणी पिणं धोक्याचं आहे. तसंच बाहेर खाण्यानेही तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे नाश्ता, जेवण घरूनच करून निघा किंवा सोबत घ्या. नाहीतर पावसाळ्यात डायरिया, मलेरियासोबत इतरही पोटांचे आजार होण्याची अधिक शक्यता असते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल