शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मानसिक आरोग्यासाठीचा निधी धूळखात; तीन वर्षांत केवळ ५.४ टक्के निधीचा विनियोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 06:39 IST

माहितीच्या अधिकारातून बाब उघड

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानसिक आरोग्याच्या स्वास्थ्याविषयी आरोग्य विभागाची अकार्यक्षमता नुकतीच उघड झाली आहे. केंद्र शासनाकडून मानसिक आरोग्याच्या कार्यक्रमासाठी राज्याला मिळालेला निधी धूळखात असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत केवळ ५.४ टक्के निधीचा विनियोग करण्यात आला आहे.राज्य शासनाला केंद्राकडून २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांत १०६.३१ कोटी रुपयांचा निधी मिळाला. तर त्या कालावधीत राज्य शासनानेही या कार्यक्रमासाठी ५१.५१ कोटींचा निधी दिला

आरोग्य विभागाने प्राप्त निधीतून केवळ ८.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच एकूण निधीच्या केवळ ५.४ टक्के निधी खर्च केला आहे. ७२ पदे रिक्त राज्य मानसिक आरोग्य कार्यक्रम निवारण उपक्रमातील मानसिक आरोग्यविषयक शाखेतील २६० मंजूर पदांपैकी १८८ पदे भरलेली आहेत, तर ७२ पदे रिक्त असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्यात १३ मानसोपचारतज्ज्ञ, ११ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ११ मानसिक आरोग्य शाखेतील सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका १७, संकलक १०, रजिस्ट्रार १० अशा पदांचा समावेश आहे.

राज्यातील अनेक मनोरुग्णालयांत मानसोपचारतज्ज्ञ नाहीत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात विशेषत: उपेक्षित लोकसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी मानसिक आरोग्य सुविधा नगण्य किंवा कमी आहे. अशा परिस्थितीत सरकारने मानसिक आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर अधिक भर द्यायला हवा.- जितेंद्र घाडगे, प्रमुख, द यंग व्हिसलब्लोअर फाऊंडेशन

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालय