शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात मस्त मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष तपासणीची गरज : फ्रूट ज्युससाठी सुमार फळांचा वापर

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ज्युसच्या हातगाडीवर कमी प्रतिची आणि हलक्या दर्जाच्या फळांचा वापर होत असल्याने आरोग्यविषयक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ज्युसच्या हातगाडीवर कमी प्रतिची आणि हलक्या दर्जाच्या फळांचा वापर होत असल्याने आरोग्यविषयक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दही ९० रुपये किलो तर ताक १८ रुपये लीटर
उन्हाळ्यात दुधाची आवक ही कमी होत असते. त्यामुळे या काळात दूध, दही व ताकाचे भाव थोडे जादा असतात. सध्या खुल्या बाजारात दही ९० रुपये किलोने तर ताक १८ रुपये लीटरने विक्री होत आहे. चांगल्या प्रतिच्या एक किलो द‘ामध्ये किमान चार ते साडे चार लिटर ताक तयार होत असते. तर एक लीटर ताकामध्ये किमान २०० मिलीचे पाच ग्लास तयार होत आहे.

चवीसाठी पुदीना व अन्य साहित्याचा वापर
ताकापासून मठ्ठा तयार करताना त्याला चव यावी यासाठी ताकामध्ये पुदिना, आद्रक, कोथींबीर, मीठ आणि तिखट बुंदीचा वापर करण्यात येत असतो. यासार्‍याचा खर्च हा प्रत्येक ग्लासामागे ५० पैशांच्या जवळपास असतो. त्यामुळे एका ग्लाससाठी सहा ते सात रुपये घरात पडत असताना विक्रेत्याकडून पाच रुपयात होणारी विक्री हे व्यवसायाचे अजब गणित आहे.

स्वच्छता व पर्यावरणाला धोका
पाच रुपयांमध्ये मठ्ठा विक्री होत असताना तो तयार करीत असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असते. त्यासोबतच तो प्लास्टिकच्या ग्लासमध्ये देण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. बहुतांशवेळा आदल्या दिवशी न संपलेले ताक हे दुसर्‍या दिवशी त्याचा मठ्ठा तयार करण्यासाठी वापर होत असल्याने आरोग्याविषयी प्रश्न निर्माण होत आहे.
१५ हजार लीटरची मागणी
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाका बसत आहे. तापमानाने चाळीशी पार केल्यानंतर दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी सारखी स्थिती आहे. त्यातच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच लग्नसराईचा मोसम असल्याने खरेदीसाठी व परीक्षार्थींची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. उन्हाळ्यात गारवा मिळविण्यासाठी अनेकांची पावले या स्वतात मस्त असलेल्या मठ्ठ्याच्या स्टॉलकडे वळत आहेत. सध्या जळगाव शहरात १५ हजार लीटर ताकाची उलाढाल होत आहे.