शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
2
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
3
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
4
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
5
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
6
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
7
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
8
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
9
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
10
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
11
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
12
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
13
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
14
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
15
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
16
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
17
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
18
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
19
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
20
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...

भारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार? भारत बायोटेकचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 21:52 IST

कोवाक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रतिकूल परिणाम झाल्याची तक्रार नाही.

तेलंगणाचे मंत्री के. तारका रामराव यांनी आज सकाळी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली, भारताची पहिली कोरोना लस बनवण्याचं काम भारत बायोटेककडून केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री केटीआर यांनी कंपनीच्या संचालकांसोबत कोरोना लसीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. यावेळी भारत बायोटेकचे एमडी कृष्णा एला यांनी कोरोना लसीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले.

कृष्णा एला म्हणाले की, आम्हाला लस बनवण्याचा खूप चांगला अनुभव आहे, कोवाक्सिन या लसीबाबत यूएस आणि जागतिक आरोग्य संघटनाही पाठबळ देत आहेत, आम्ही या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एकत्र मुकाबला करत आहोत. वॉटर बॉटलपेक्षा कमी किंमतीत कोरोनावरील लस देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले.

कोवाक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रतिकूल परिणाम झाल्याची तक्रार नाही. डॉक्टरांनी १४ दिवसांपूर्वी डोस दिलेल्या स्वयंस्वेवकांना आता दुसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. तर कोवाक्सिन लस ही २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात उपलब्ध होऊ शकेल असा विश्वास भारत बायोटेकने व्यक्त केला आहे.

दरम्यान, जगात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीत रशिया सर्वांच्या पुढे आहे. रशिया ऑक्टोबर महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या लसीकरण कार्यक्रमाला सुरू करणार आहे. ज्या अर्थी रशिया, असा दावा करत आहे, त्या अर्थी त्या कोरोनावरील लस तयार करण्याच्या बाबतीत इंग्लंड, अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले, असेच म्हणावे लागेल.

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण ६६.३४ टक्के इतके आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३८ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात जवळपास २ कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. २४ तासात साडेसहा लाखाहून अधिक कोरोना टेस्ट झाली आहे. सध्या भारतात दोन कंपन्या कोरोना लसीची चाचणी करत आहेत. यात भारत बायोटेक आणि जायडस कॅडिला दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत अशी माहिती आयसीएमआरनं दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या