शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोकं पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी करा ‘हेड, बॉडी मसाज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:39 IST

नकारात्मक विचार घालवून रिफ्रेश होण्यासाठी काय कराल?

ठळक मुद्देआपल्या निराशाजनक मनस्थितीला पुन्हा ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज.महिलांच्या बाबतीत मेनिक्युअर आणि पेडिक्युअरनंही चांगलाच फरक पडेल आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल.निराशाजनक, त्रास देणाºया विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या. त्या भावनांना मुक्त वाट करून द्या.

- मयूर पठाडेकधी कधी आपल्याला खूप काम पडतं. मरेस्तोवर काम. कधी हे काम संपेल आणि आपण त्यातून बाहेर पडू असं आपल्याला होतं. पण ते काम संपता संपत नाही आणि संपलं तरी त्याचं यायचं ते टेन्शन येतंच. हे टेन्शन मग आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या टेन्शननं आपली कामगिरी बजावलेली असते आणि त्यामुळे आपल्या मूडचेही पार तीनतेरा वाजलेले असतात..अशा वेळी फार काही न करता आपल्या मनस्थितीला पुन्हा ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज. घरच्या घरी आपण स्वत:, आपल्या घरातील कोणी व्यक्तीनं किंवा अगदी सलूनमध्ये जाऊनच जर तुम्ही मसाज करून घेतला तर आणखीच उत्तम. या मसाजमुळे आपण खरोखरच रिलॅक्स होतो. आपला मूड ताळ्यावर येतो. एक अनामिक शांती आपल्याला लाभते. कधी आपण खूप टेन्शनमध्ये असलो आणि कामानं बेजार झालेलो असलो तर हा उपाय नक्की करून पाहा. तो तुम्हाला नुसतं रिलॅक्सच करणार नाही, तर तो तुम्हाला नवी ऊर्जा प्राप्त करून देईल आणि नव्या उमेदीनं तुम्ही आपलं काम करू शकेल.महिलांच्या बाबतीत मेनिक्युअर आणि पेडिक्युअरनंही चांगलाच फरक पडेल आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल. अगदीच काही नाही तर डोळे मिटून शांतपणे थोडावेळ पडून राहा. सगळ्या विचारांना आपल्या मनातून घालवायचा प्रयत्न करा. विचार असे सहजासहजी जात नाहीत, पण तरीही तुम्ही नक्कीच फ्रेश व्हाल.टेन्शन आल्यावर दुसरा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या निराशाजनक, त्रास देणाºया विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. त्यांच्यासाठी वाट मोकळी करून द्या. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या. त्या भावनांना मुक्त वाट करून द्या. आपल्या जवळच्या कोणा तरी व्यक्तीशी त्या विषयावर बोला. साचलेलं सगळं मळभ साफ झाल्यानं, मोरीत अडकलेला बोळा निघाल्यावर साचलेलं पाणी जसं सुसाट निघून जातं, तसंच या नकारात्मक भावनाही थोड्याच वेळात कुठल्या कुठे पळून जाईल..