शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तुम्हीच ‘जमदग्नी’ असाल, तर मुलांनी कसं शिकावं प्रेशर हॅँडलिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:47 IST

मुलांना तणावावर नियंत्रण ठेवायला शिकवायचं असेल पालकांना कराव्या लागतील या गोष्टी..

ठळक मुद्देमुलं आणि आपल्याबंधले बंध कायम बळकट ठेवा.मुलांचं ऐकून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदत करा.आपल्या स्वप्रतिमेची काळजी घ्या.मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या.

- मयूर पठाडेज्याला आयुष्यात कधीच दु:खाचा, निराशेचा सामना करावा लागला असा एक तरी जगात आहे का? ब्रहदेवाचीही यातून सुटका झालेली नाही, मग आपण एवढे कोण तिसमारखॉँ लागून गेलो आहोत?टेन्शनच्या नावानं आपण नेहमीच गळे काढत असतो. टेन्शनमुळे मी आजारी पडलो, माझं प्रमोशन हुकलं, माझी प्रगती झाली नाही.. एक ना दोन..जे आपण बोलतो तेच आपण आपल्या मुलांमध्येही पेरत असतो.रोजच्या आयुष्यात आशा-निराशेचे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. प्रत्येकालाच त्याचा सामना करावा लागतो, पण त्याच्याशी दोन हात करताना आपली भूमिका काय असते तेही महत्त्वाचं असतं.आजकाल तर लहान मुलांमध्येही आपल्या टेन्शन्स दिसतात. ते साहजिकही आहे, पण त्या त्या प्रसंगांत आपण त्यांच्याशी कसं वागतो, यालाही खूपच महत्त्व आहे.खरं तर सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपल्या भावनांवर नियंत्रण राखायला आपण शिकलं पाहिजे. ते आपल्याला जमलं तर आपोआपच मुलांमध्येही त्याची रुजवात होते.तरीही या काही गोष्टी..मुलांची पिअर प्रेशर्स सांभाळताना, त्यांना त्यातून बाहेर काढताना काही गोष्टींची काळजी पालक म्हणून आपणच घेतली पाहिजे. नाहीतर जे आपल्याबाबत झालं, तेच त्यांच्याबाबतही होईल. मुलांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातील पिअर प्रेशर्सबाबत प्रशिक्षित करताना पालक म्हणून तुम्ह्ी काय कराल?१- मुलं आणि आपल्याबंधले बंध कायमच बळकट राहातील याकडे लक्ष द्या.२- मुलं जेव्हा कोणतंही टेन्शन, आपला प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतात, तेव्हा प्रश्न कितीही छोटा असो, त्यांचं ऐकून घ्या. हाडतूड करून त्यांना परत पाठवू नका.३- आपल्या मुलांनी कितीही चुकीचं काम केलं असेल तरी लगेच विचित्र पद्धतीनं रिअ‍ॅक्ट होऊ नका. हे जमणं तसं अवघड आहे, पण करून पाहा. शांतपणे त्याला समजावून सांगा. काही वेळा प्रयत्न करा, नक्कीच, तुम्हाला आणि त्यालाही जमायला लागेल.४- आपल्या स्वप्रतिमेचीही काळजी घ्या. आपण राक्षस, सैतान, संतापी आहोत अशी प्रतिमा मुलांच्या मनात तयार होऊ देऊ नका.५- मुलांना चांगले निर्णय घेता येतील यासाठी त्यांना तयार करा, प्रोत्साहन द्या.६- आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, त्याची संगत चांगल्या मुलांशी आहे की नाही, एकत्र असताना ते काय करतात, याकडेही वरचेवर लक्ष असू द्या, मुलांशी बोलत चला..