शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मृत्यू कारणात हृदयरोग ‘नंबर वन’वरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:55 IST

मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी झालेल्या विविध आजराने झालेल्या मृत्यूची कारणे माहितीच्या अधिकारात दिली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्यावर्षी मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ९४ हजार ५३८ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक ९,४७० मृत्यू हृदयविकाराने, तर त्या खालोखाल ९,१४५ मृत्यू हे कॅन्सरने झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण क्षयरोग असून, ३,२८१ मृत्यू या आजारामुळे झाले  आहेत. मृत्यूची  माहिती देण्यासाठी २९ कारणे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक मृत्यूंची नोंद शेवटचे कारण म्हणजे ‘कोणत्या तरी आजाराने’ असे सांगण्यात आले आहे.     

मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी झालेल्या विविध आजराने झालेल्या मृत्यूची कारणे माहितीच्या अधिकारात दिली आहेत. विशेष म्हणजे या सर्व मृत्यूची माहिती देण्यासाठी २९ कारणांची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबईत अजूनही कॉलराने मृत्यू होत असल्याचे दिसून येत असून एका रुग्णाचा मृत्यू कॉलराने झाल्याचे नमूद केले आहे. आणखी जी काही कारणे आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे  कोणत्या तरी आजाराने ‘ या वर्गवारीत एकूण मृत्यूंपैकी निम्म्यापेक्षा म्हणजे ६० हजार ५५५ नगरिकांचा मृत्यू इतर आजराने झाल्याचे सांगण्यात येते. ही संख्या सर्वाधिक आहे. तर  दारूमुळे ३३१, डेंग्यूमुळे २४६, मलेरियामुळे ८९ रुग्ण दगावले आहेत. त्यासोबत स्वाईन फ्लूमुळे ५५, रुग्ण भाजल्यामुळे २१८, तर गोवरमुळे १४ रुग्ण दगावले आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.       

आजही मृत्यूचे नंबर वन कारण हे हृदयरोगच आहे. कारण पन्नाशी, साठीतला हृदयरोग आता ३० वयाखालील तरुणांमध्ये दिसत आहे. या सर्वांसाठी प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. शाळेत जीवशैली कशापद्धतीने असावी हे शिकविले गेले पाहिजे. कारण खाण्याची शिस्त लहानपानापासून लागणे गरजेची आहे. आपण काय आणि कशा पद्धतीने खातो, याचा आरोग्यावर चांगला, वाईट परिणाम होतो. गेल्या २७ वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये यावेळी प्रथमच ३० वर्षांखालील तरुणाची हृदयरोगाची आकडेवारी मागण्यात आली आहे. इतक्या झपाट्याने तरुणांना हृदयरोग होत आहे.     - डॉ. अजय चौरसिया, हृदयरोग विभागप्रमुख, नायर रुग्णालय 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका