शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

चाळीशीच्या आतच हृदयरोगाचा विळखा; दहा वर्षांत २५० टक्क्यांनी वाढले प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 08:59 IST

शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई : गेल्या दहा वर्षांपर्यंत निवृत्तीनंतरचा आजार अशी ओळख असलेल्या हृदयविकाराने ग्रासण्याचे वय आता झपाट्याने घटत असून, आता वयाच्या चाळीशीच्या आत असलेल्या व्यक्तींना या आजाराने मोठ्या प्रमाणावर विळखा घालण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सरत्या दहा वर्षांत तरुण पिढीला हृदयविकाराने ग्रासण्याच्या प्रमाणात तब्बल २५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. 

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे २०२० मधे वयाच्या चाळीशीच्या आत आलेल्या रुग्णांची संख्या ही ११६ होती. मात्र, हीच संख्या २०२१ मधे १६८ इतकी झाली, तर २०२२ मधे जानेवारी ते एप्रिल या नव्या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच हा आकडा आतापर्यंत ६७ वर गेला आहे. चाळीशीच्या आत, म्हणजे केवळ ३५ ते ४० वयोगटातीलच नव्हे तर वयाच्या तिशीच्या आतील रुग्णांचाही यात समावेश आहे. अलीकडेच २३ वर्षांच्या एका मुलाला आलेला हृदयविकाराचा झटका ही अतिशय चितेंची बाब असल्याचे मत डॉ. सुरासे यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे  यांनी सांगितले की, २०२० मध्ये एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. जवळपास २५० हून अधिक मृत्यू एका दिवसात झाले आहेत. या मृत्यूंचे संशोधनात्मक परीक्षण होणे गरजेचे आहे. या परीक्षणातून या नेमकी कारणे विशद करता येतील.

 काय करायला हवे? nएखाद्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा झटका अथवा तत्सम काही लक्षणे जाणवली तर कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. तातडीने त्याला जवळच्या दवाखान्यात न्यावे.nहृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिला एक तास हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तातडीने रुग्णाला दवाखान्यात नेले तर त्यावर उपचार होऊन हृदयाची हानी कमी होण्यास मदत होते. यामुळे या पहिल्या तासाला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.

हृदयविकाराने दाखल होणाऱ्या रुग्णांमधे मधुमेह आणि धूम्रपानाची सवय असल्याचेही प्रामुख्याने दिसून येत असून, या रुग्णांच्या हृदयातील रक्त वाहिन्या अरुंद होतात.

नोकरी जाण्याचे भीती, मानसिक तणाव, अपुरी झोप, बदललेल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा आळस या घटकांमुळे प्रामुख्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. - डॉ. विजय सुरासे, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग