शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

चाळीशीच्या आतच हृदयरोगाचा विळखा; दहा वर्षांत २५० टक्क्यांनी वाढले प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 08:59 IST

शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई : गेल्या दहा वर्षांपर्यंत निवृत्तीनंतरचा आजार अशी ओळख असलेल्या हृदयविकाराने ग्रासण्याचे वय आता झपाट्याने घटत असून, आता वयाच्या चाळीशीच्या आत असलेल्या व्यक्तींना या आजाराने मोठ्या प्रमाणावर विळखा घालण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सरत्या दहा वर्षांत तरुण पिढीला हृदयविकाराने ग्रासण्याच्या प्रमाणात तब्बल २५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. 

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे २०२० मधे वयाच्या चाळीशीच्या आत आलेल्या रुग्णांची संख्या ही ११६ होती. मात्र, हीच संख्या २०२१ मधे १६८ इतकी झाली, तर २०२२ मधे जानेवारी ते एप्रिल या नव्या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच हा आकडा आतापर्यंत ६७ वर गेला आहे. चाळीशीच्या आत, म्हणजे केवळ ३५ ते ४० वयोगटातीलच नव्हे तर वयाच्या तिशीच्या आतील रुग्णांचाही यात समावेश आहे. अलीकडेच २३ वर्षांच्या एका मुलाला आलेला हृदयविकाराचा झटका ही अतिशय चितेंची बाब असल्याचे मत डॉ. सुरासे यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे  यांनी सांगितले की, २०२० मध्ये एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. जवळपास २५० हून अधिक मृत्यू एका दिवसात झाले आहेत. या मृत्यूंचे संशोधनात्मक परीक्षण होणे गरजेचे आहे. या परीक्षणातून या नेमकी कारणे विशद करता येतील.

 काय करायला हवे? nएखाद्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा झटका अथवा तत्सम काही लक्षणे जाणवली तर कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. तातडीने त्याला जवळच्या दवाखान्यात न्यावे.nहृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिला एक तास हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तातडीने रुग्णाला दवाखान्यात नेले तर त्यावर उपचार होऊन हृदयाची हानी कमी होण्यास मदत होते. यामुळे या पहिल्या तासाला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.

हृदयविकाराने दाखल होणाऱ्या रुग्णांमधे मधुमेह आणि धूम्रपानाची सवय असल्याचेही प्रामुख्याने दिसून येत असून, या रुग्णांच्या हृदयातील रक्त वाहिन्या अरुंद होतात.

नोकरी जाण्याचे भीती, मानसिक तणाव, अपुरी झोप, बदललेल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा आळस या घटकांमुळे प्रामुख्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. - डॉ. विजय सुरासे, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग