शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीशीच्या आतच हृदयरोगाचा विळखा; दहा वर्षांत २५० टक्क्यांनी वाढले प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 08:59 IST

शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई : गेल्या दहा वर्षांपर्यंत निवृत्तीनंतरचा आजार अशी ओळख असलेल्या हृदयविकाराने ग्रासण्याचे वय आता झपाट्याने घटत असून, आता वयाच्या चाळीशीच्या आत असलेल्या व्यक्तींना या आजाराने मोठ्या प्रमाणावर विळखा घालण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सरत्या दहा वर्षांत तरुण पिढीला हृदयविकाराने ग्रासण्याच्या प्रमाणात तब्बल २५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. 

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे २०२० मधे वयाच्या चाळीशीच्या आत आलेल्या रुग्णांची संख्या ही ११६ होती. मात्र, हीच संख्या २०२१ मधे १६८ इतकी झाली, तर २०२२ मधे जानेवारी ते एप्रिल या नव्या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच हा आकडा आतापर्यंत ६७ वर गेला आहे. चाळीशीच्या आत, म्हणजे केवळ ३५ ते ४० वयोगटातीलच नव्हे तर वयाच्या तिशीच्या आतील रुग्णांचाही यात समावेश आहे. अलीकडेच २३ वर्षांच्या एका मुलाला आलेला हृदयविकाराचा झटका ही अतिशय चितेंची बाब असल्याचे मत डॉ. सुरासे यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, शहर, उपनगरांत २०२० मध्ये झालेल्या एक लाख १० हजार मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे  यांनी सांगितले की, २०२० मध्ये एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. जवळपास २५० हून अधिक मृत्यू एका दिवसात झाले आहेत. या मृत्यूंचे संशोधनात्मक परीक्षण होणे गरजेचे आहे. या परीक्षणातून या नेमकी कारणे विशद करता येतील.

 काय करायला हवे? nएखाद्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा झटका अथवा तत्सम काही लक्षणे जाणवली तर कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. तातडीने त्याला जवळच्या दवाखान्यात न्यावे.nहृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिला एक तास हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तातडीने रुग्णाला दवाखान्यात नेले तर त्यावर उपचार होऊन हृदयाची हानी कमी होण्यास मदत होते. यामुळे या पहिल्या तासाला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.

हृदयविकाराने दाखल होणाऱ्या रुग्णांमधे मधुमेह आणि धूम्रपानाची सवय असल्याचेही प्रामुख्याने दिसून येत असून, या रुग्णांच्या हृदयातील रक्त वाहिन्या अरुंद होतात.

नोकरी जाण्याचे भीती, मानसिक तणाव, अपुरी झोप, बदललेल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा आळस या घटकांमुळे प्रामुख्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. - डॉ. विजय सुरासे, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोग