शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : जमिनीवर बसूनच का जेवण करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 16:37 IST

जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया.

-Ravindra Moreसध्या प्रत्येकजण एखाद्यातरी आजाराने त्रस्त आहे, याचे कारण म्हणजे धकाधकीची जीवनशैली. मनुष्याचे जीवनमान झपाट्याने बदलत असून त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहेत. या बदलात जेवण करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. त्यामुळे शरीराच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया. * पचनक्रिया सुधारते - जमिनीवर बसून जेवण केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि जेवण चांगले पचते. विशेष म्हणजे जमिनीवर जेव्हा आपण बसतो, तेव्हा सुखासनात बसलेलो असतो, जी पचनक्रियेत मदत करणारी मुद्रा आहे. जेव्हा आपण जेवणासाठी या मुद्रेत बसतो तेव्हा पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. जेव्हा आपण खाण्यासाठी पुढे झुकतो तर पोटाच्या मांसपेशी मागे पुढे होत असतात, त्यामुळे त्या सक्रिय होतात. या क्रियेमुळे आपल्या पोटातील अ‍ॅसिड वाढते आणि त्यामुळे जेवण सहज पचते. * वजन नियंत्रित राहते- जमिनीवर बसून जेवण केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा आपण सुखासनात बसता तेव्हा आपला मेंदू आपोआपच शांत होतो आणि पूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित होते. तसेच बसून जेवल्याने भरपूर खाल्ल्याबाबत पोट आणि मेंदूला योग्य वेळी जाणीव होते, त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक खाण्यापासून आपण सावध होतो. * शरीर लवचिक होते- जमिनीवर बसून जेवल्याने आपले शरीर लवचिक होते. जेव्हा आपण पद्मासनात बसता, तर आपल्या पाठीचा खालचा भाग, पोटाच्या भोवतालचा भाग आणि पोटाच्या मांसपेशीत ताण निर्माण होतो. यामुळे पाचनतंत्र सहज आपले काम करते. शिवाय या स्थितीमुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात, ज्यामुळे आपण केलेले जेवण चांगले पचते. * जेवणावर लक्ष असतेजमिनीवर बसून जेवल्याने आपले लक्ष जेवणावर असते. याशिवाय जेवण करतेवेळी योग्य पयार्यांची निवड करण्याची क्षमता विकसित होते. कारण या मुद्रेत आपले मन खूप शांत आणि आपले शरीर पोषणाला स्वीकारण्यास तयार होते.  * संंबंध जोपासले जातात- एकत्र जमिनीवर बसून जेवण केल्याने कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतात. योग्यवेळी जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र जेवण करतो तेव्हा आपसातील सामंजस्य वाढते. शिवाय परिवाराशी जोडण्याचा हा एक योग्य आणि चांगला मार्ग आहे. * वेळेच्या अगोदर म्हातारपण येणार नाही- जमिनीवर बसून जेवण केल्याने वेळेच्या अगोदर म्हातारपण येत नाही. कारण या मुद्रेत जेवण केल्याने पाठीचा कणा आणि पाठीशी संबंधित समस्या उद्भवत नाही. सोबतच चुकीच्या पद्धतीने बसणाºयांना होत असलेल्या त्रासापासून सुटका मिळते. * वय वाढतेजमिनीवर बसून जेवल्याने वयदेखील वाढते. जेव्हा आपण जमिनीवर पद्मासनात किंवा सुखासनात बसतो आणि कुणाच्याही मदतीने उभे राहतो तेव्हा आपले स्रायू मजबूत होतात. त्यामुळे त्यांची सक्षमता वाढते, कारण या मुद्रेतून उठताना अधिक लवचिकता आणि शारीरिक ताकदीची आवश्यकता असते. * सांधेदु:खीवर फायदेशीर - पद्मासन आणि सुखासन एक अशी मुद्रा आहे जी आपल्या संपूर्ण शरीराला फायदेशीर ठरते शिवाय लवचिकही बनविते. ही मुद्रा आपल्या पचनक्रियेलाच सुधारत नाही तर आपल्या सांध्यांना कोमल आणि लवचिक बनण्यास मदत करते. * मेंदूसाठी फायदेशीर जमिनीवर बसून जेवण केल्याने मेंदू मजबूत होण्यास मदत होते. जे लोक सुखासनात बसून जेवण करतात त्यांचा मेंदू तणावरहीत राहण्याची शक्यता जास्त असते, कारण ही मुद्रा मेंदू आणि पेशींना शांत ठेवते. * ह्रदयदेखील होते मजबूत- जेव्हा आपण जमिनीवर बसून जेवण करता त्यावेळी रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. यामुळे ह्रदय सहजतेने पचनक्रियेला मदत करणाऱ्या सर्व भागांपर्यंत रक्त पोहोचवते, मात्र जेव्हा आपण खुर्चीवर बसून जेवण करता तेव्हा रक्ताभिसरण विपरित होते. यात हे रक्ताभिसरण फक्त पायांपर्यंतच होते. हेच जेवण करतेवेळी योग्य नाही.  Also Read : ​हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?                    : निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा !