शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

​HEALTH : जमिनीवर बसूनच का जेवण करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 16:37 IST

जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया.

-Ravindra Moreसध्या प्रत्येकजण एखाद्यातरी आजाराने त्रस्त आहे, याचे कारण म्हणजे धकाधकीची जीवनशैली. मनुष्याचे जीवनमान झपाट्याने बदलत असून त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहेत. या बदलात जेवण करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. त्यामुळे शरीराच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. जमिनीवर बसून जेवण करण्याची परंपरा तशी खूप प्राचीन आहे. जमिनीवर बसून जेवण केल्याने आरोग्याचे अनेक फायदे आहेत. सुदृढ आरोग्यासाठी जमिनीवर बसूनच जेवण करावे. मग नेमके कोणते फायदे आहेत, याबाबत आजच्या सदरातून जाणून घेऊया. * पचनक्रिया सुधारते - जमिनीवर बसून जेवण केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि जेवण चांगले पचते. विशेष म्हणजे जमिनीवर जेव्हा आपण बसतो, तेव्हा सुखासनात बसलेलो असतो, जी पचनक्रियेत मदत करणारी मुद्रा आहे. जेव्हा आपण जेवणासाठी या मुद्रेत बसतो तेव्हा पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. जेव्हा आपण खाण्यासाठी पुढे झुकतो तर पोटाच्या मांसपेशी मागे पुढे होत असतात, त्यामुळे त्या सक्रिय होतात. या क्रियेमुळे आपल्या पोटातील अ‍ॅसिड वाढते आणि त्यामुळे जेवण सहज पचते. * वजन नियंत्रित राहते- जमिनीवर बसून जेवण केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा आपण सुखासनात बसता तेव्हा आपला मेंदू आपोआपच शांत होतो आणि पूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित होते. तसेच बसून जेवल्याने भरपूर खाल्ल्याबाबत पोट आणि मेंदूला योग्य वेळी जाणीव होते, त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक खाण्यापासून आपण सावध होतो. * शरीर लवचिक होते- जमिनीवर बसून जेवल्याने आपले शरीर लवचिक होते. जेव्हा आपण पद्मासनात बसता, तर आपल्या पाठीचा खालचा भाग, पोटाच्या भोवतालचा भाग आणि पोटाच्या मांसपेशीत ताण निर्माण होतो. यामुळे पाचनतंत्र सहज आपले काम करते. शिवाय या स्थितीमुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात, ज्यामुळे आपण केलेले जेवण चांगले पचते. * जेवणावर लक्ष असतेजमिनीवर बसून जेवल्याने आपले लक्ष जेवणावर असते. याशिवाय जेवण करतेवेळी योग्य पयार्यांची निवड करण्याची क्षमता विकसित होते. कारण या मुद्रेत आपले मन खूप शांत आणि आपले शरीर पोषणाला स्वीकारण्यास तयार होते.  * संंबंध जोपासले जातात- एकत्र जमिनीवर बसून जेवण केल्याने कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतात. योग्यवेळी जेव्हा संपूर्ण परिवार एकत्र जेवण करतो तेव्हा आपसातील सामंजस्य वाढते. शिवाय परिवाराशी जोडण्याचा हा एक योग्य आणि चांगला मार्ग आहे. * वेळेच्या अगोदर म्हातारपण येणार नाही- जमिनीवर बसून जेवण केल्याने वेळेच्या अगोदर म्हातारपण येत नाही. कारण या मुद्रेत जेवण केल्याने पाठीचा कणा आणि पाठीशी संबंधित समस्या उद्भवत नाही. सोबतच चुकीच्या पद्धतीने बसणाºयांना होत असलेल्या त्रासापासून सुटका मिळते. * वय वाढतेजमिनीवर बसून जेवल्याने वयदेखील वाढते. जेव्हा आपण जमिनीवर पद्मासनात किंवा सुखासनात बसतो आणि कुणाच्याही मदतीने उभे राहतो तेव्हा आपले स्रायू मजबूत होतात. त्यामुळे त्यांची सक्षमता वाढते, कारण या मुद्रेतून उठताना अधिक लवचिकता आणि शारीरिक ताकदीची आवश्यकता असते. * सांधेदु:खीवर फायदेशीर - पद्मासन आणि सुखासन एक अशी मुद्रा आहे जी आपल्या संपूर्ण शरीराला फायदेशीर ठरते शिवाय लवचिकही बनविते. ही मुद्रा आपल्या पचनक्रियेलाच सुधारत नाही तर आपल्या सांध्यांना कोमल आणि लवचिक बनण्यास मदत करते. * मेंदूसाठी फायदेशीर जमिनीवर बसून जेवण केल्याने मेंदू मजबूत होण्यास मदत होते. जे लोक सुखासनात बसून जेवण करतात त्यांचा मेंदू तणावरहीत राहण्याची शक्यता जास्त असते, कारण ही मुद्रा मेंदू आणि पेशींना शांत ठेवते. * ह्रदयदेखील होते मजबूत- जेव्हा आपण जमिनीवर बसून जेवण करता त्यावेळी रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. यामुळे ह्रदय सहजतेने पचनक्रियेला मदत करणाऱ्या सर्व भागांपर्यंत रक्त पोहोचवते, मात्र जेव्हा आपण खुर्चीवर बसून जेवण करता तेव्हा रक्ताभिसरण विपरित होते. यात हे रक्ताभिसरण फक्त पायांपर्यंतच होते. हेच जेवण करतेवेळी योग्य नाही.  Also Read : ​हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?                    : निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा !