शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

तुम्हीसुद्धा रोज शरीराला घातक ठरणाऱ्या भाज्या खाताय? रिपोर्टमधून समोर आली धक्कदायक बाब

By manali.bagul | Updated: October 13, 2020 20:08 IST

Health Tips : भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळतं. पण अनेक भागात विषारी आणि शरीरासाठी घातक असलेल्या भाज्या विकल्या जातात. सतत अशा प्रकारच्या भाज्याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. 

कोणत्याही आजारापासून लांब राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक असतं. त्यासाठी नेहमी पोषण देत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष  देणं गरजेचं आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास कोरोना आणि कोरोनसारख्या  इतर साथीच्या आजारांपासून बचाव करणं कठीण होऊ शकतं. भाज्या आणि फळांमधून शरीराला पोषण मिळतं. पण अनेक भागात विषारी आणि शरीरासाठी घातक असलेल्या भाज्या विकल्या जातात. सतत अशा प्रकारच्या भाज्याचे सेवन केल्याने आरोग्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. 

काही भाज्यांमध्ये शिसं आणि कॅडमियमसारखे घातक धातू असल्याचं दिसून आलं आहे. जवळपास 9.5 टक्के भाजा या खाण्यायोग्य नसल्याचं देखील दिसून आलं आहे. भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि प्राधिकरणाच्या एक अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासासाठी विविध राज्यांमधील नमुने यासाठी घेण्यात आले होते. यामध्ये १० टक्के भाज्या या खाण्यायोग्य नव्हत्या. यात मध्य प्रदेशातील सर्वांत जास्त नमुने खाण्यायोग्य नसल्याचं समोर आलं.

जवळपास 25 टक्के भाज्या या खाण्यायोग्य नव्हत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगढ असून तेथील 13 टक्के भाज्या खाण्यायोग्य नव्हत्या. त्यानंतर बिहार, चंदीगड, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, पंजाब आणि दिल्लीचा क्रमांक आहे.  डीएनएने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील टोमॅटोच्या नमुन्यांमध्ये जवळपास 600 मायक्रोग्राम इतकं शिसं आढळून आलं होतं. इतकंच नाही तर देशभरातील भाज्यांमध्ये कॅडमिअम, अर्सेनिक आणि मर्क्युरीसारखे घातक धातूदेखील आढळून आले होते.  WHO प्रमुखांनी दिल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, 'या' कारणामुळे भारताचं केलं कौतुक

FSSAIने या परिक्षणासासठी फळभाज्यसह पालेभाज्या आणि कंदमुळांचीही तपासणी केली होती. यात दिसून आलं की, कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे भाज्या शरीरासाठी घातक ठरत असल्याचे  FSSAI ला आपल्या निरीक्षणात दिसून आलं आहे. यावर उपाय म्हणून भाज्या शिजवण्याआधी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. बाजारातून भाजी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या. भाज्या उकळून आणि उकडून घ्याव्यात. मिठाच्या पाण्यातदेखील भाज्या काही वेळ ठेवल्यास त्या प्रदूषणापासून मुक्त होतात. सध्या कोरोनाची भीती असल्यामुळे सगळेचजण भाज्या धुवून स्वच्छ करून घेतात. ही सवय नेहमीच ठेवली तर आजारांपासून बचाव होऊ शकतो. हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न