शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हाताला गाठ लागली, काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 09:49 IST

स्वत:कडे दुर्लक्ष, संकोच, आर्थिक चिंता या चक्रात कॅन्सर गाठतो तेव्हा..

- डॉ. निष्ठा पालेजाआमच्याकडेही ग्रामीण भागातून स्तनांचा कर्करोग झालेल्या महिला रुग्ण येतात त्या आजार तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतरच. स्तनाची गाठ मानेपर्यंत पसरलेली असते. स्तनाच्या त्वचेला जखमा झालेल्या असतात. अशा टप्प्यात केवळ उपचाराचा कालावधी आणि खर्चच वाढतो असं नाही तर उपचाराची तीव्रताही वाढते. त्याउलट लवकर निदान झालं तर एका छोट्या आॅपरेशननंही महत्त्वाचं काम होऊ शकतं. मात्र आजार तिसºया टप्प्यात पोहचतो तेव्हा रेडिएशन, ते नको असेल तर स्तन काढून टाकणं यासह बरीच मोठी उपचार प्रक्रिया करावी लागते.आजार एवढा वाढल्यावर का आल्या असं या ग्रामीण भागातील महिलांना विचारतो. मात्र त्या जे सांगतात त्यातून आजाराविषयी माहितीचा अभाव आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकताच समोर येते.

स्वत:च्या स्तनांची तपासणी स्वत: करणं हे ग्रामीण भागातल्या महिलांना माहिती नसतं त्यामुळे आपल्या लेकीबाळींना यासंदर्भात चार शहाणपणाच्या गोष्टीही त्या सांगू शकत नाही.दुसरी गोष्ट म्हणजे बायकांचा स्वत:च्या आरोग्याकडे बघण्याचा दुय्यम दृष्टिकोन. आधी घरातल्यांचं, मुलाबाळांचं, नव-याचं, सासूसासºयांचं करून मग वेळ उरला तर बाई स्वत:कडे पाहते. स्वत:च्या दुखण्या-खुपण्याकडे बारकाईनं बघण्याची मानसिकताच नाही. त्यातून स्तनात न दुखणारी गाठ लागली तर तिचा काही त्रास नाही म्हणून सर्रास दुर्लक्ष होतं. आणि गाठ हाताला लागली तर ती कॅन्सरची असेल या भीतीनंही डॉक्टरकडे जाण्याचा संकोच. स्तनासारखी अवघड जागा डॉक्टरांना कशी दाखवावी (महिला डॉक्टरलाही) अशी लाजही वाटते. पैशांची चणचण, मुलांचं शिक्षण यांसारख्या आर्थिक अडचणीही असतातच.

यासर्व कारणांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आपला आजार घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहचायला बराच उशीर झालेला असतो. आधीच स्वत:च्या खाण्यापिण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषक मूल्यांची मोठी कमतरता असते. त्यात किमोथेरेपी सुरू केल्यानंतर विशिष्ट आहार घेण्याकडेही त्यांचा कल नसतो. एकतर त्रास होतो म्हणून खाणार नाही नाहीतर मिळेल ते खाणार यामुळे अजूनच शरीरात कमतरता निर्माण होतात. याच कारणामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोग रिकरन्सची शक्यता खूप दाट असते.

थोडी जागरूकता ठेवली, स्तनांचं स्वपरीक्षण शिकून घेतलं, त्यातलं गांभीर्य ओळखलं तर खूप उशिराच्या टप्प्यावर जाऊन आजाराशी लढाई लढावी लागणार नाही. वैद्यकीय यंत्रणेनं ग्रामीण भागातील, वाड्यापाड्यातील महिलांपर्यंत पोहचणं जितकं गरजेचं आहे तितकंच या महिलांनीही आपल्या मनातला संकोच बाजूला सारून स्वत:साठी म्हणून डॉक्टरांकडे येणंही गरजेचं आहे.(संचालक, क्लिनिकल रिसर्च एचएससी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक) 

टॅग्स :cancerकर्करोग