शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हाताला गाठ लागली, काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 09:49 IST

स्वत:कडे दुर्लक्ष, संकोच, आर्थिक चिंता या चक्रात कॅन्सर गाठतो तेव्हा..

- डॉ. निष्ठा पालेजाआमच्याकडेही ग्रामीण भागातून स्तनांचा कर्करोग झालेल्या महिला रुग्ण येतात त्या आजार तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतरच. स्तनाची गाठ मानेपर्यंत पसरलेली असते. स्तनाच्या त्वचेला जखमा झालेल्या असतात. अशा टप्प्यात केवळ उपचाराचा कालावधी आणि खर्चच वाढतो असं नाही तर उपचाराची तीव्रताही वाढते. त्याउलट लवकर निदान झालं तर एका छोट्या आॅपरेशननंही महत्त्वाचं काम होऊ शकतं. मात्र आजार तिसºया टप्प्यात पोहचतो तेव्हा रेडिएशन, ते नको असेल तर स्तन काढून टाकणं यासह बरीच मोठी उपचार प्रक्रिया करावी लागते.आजार एवढा वाढल्यावर का आल्या असं या ग्रामीण भागातील महिलांना विचारतो. मात्र त्या जे सांगतात त्यातून आजाराविषयी माहितीचा अभाव आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकताच समोर येते.

स्वत:च्या स्तनांची तपासणी स्वत: करणं हे ग्रामीण भागातल्या महिलांना माहिती नसतं त्यामुळे आपल्या लेकीबाळींना यासंदर्भात चार शहाणपणाच्या गोष्टीही त्या सांगू शकत नाही.दुसरी गोष्ट म्हणजे बायकांचा स्वत:च्या आरोग्याकडे बघण्याचा दुय्यम दृष्टिकोन. आधी घरातल्यांचं, मुलाबाळांचं, नव-याचं, सासूसासºयांचं करून मग वेळ उरला तर बाई स्वत:कडे पाहते. स्वत:च्या दुखण्या-खुपण्याकडे बारकाईनं बघण्याची मानसिकताच नाही. त्यातून स्तनात न दुखणारी गाठ लागली तर तिचा काही त्रास नाही म्हणून सर्रास दुर्लक्ष होतं. आणि गाठ हाताला लागली तर ती कॅन्सरची असेल या भीतीनंही डॉक्टरकडे जाण्याचा संकोच. स्तनासारखी अवघड जागा डॉक्टरांना कशी दाखवावी (महिला डॉक्टरलाही) अशी लाजही वाटते. पैशांची चणचण, मुलांचं शिक्षण यांसारख्या आर्थिक अडचणीही असतातच.

यासर्व कारणांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आपला आजार घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहचायला बराच उशीर झालेला असतो. आधीच स्वत:च्या खाण्यापिण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषक मूल्यांची मोठी कमतरता असते. त्यात किमोथेरेपी सुरू केल्यानंतर विशिष्ट आहार घेण्याकडेही त्यांचा कल नसतो. एकतर त्रास होतो म्हणून खाणार नाही नाहीतर मिळेल ते खाणार यामुळे अजूनच शरीरात कमतरता निर्माण होतात. याच कारणामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोग रिकरन्सची शक्यता खूप दाट असते.

थोडी जागरूकता ठेवली, स्तनांचं स्वपरीक्षण शिकून घेतलं, त्यातलं गांभीर्य ओळखलं तर खूप उशिराच्या टप्प्यावर जाऊन आजाराशी लढाई लढावी लागणार नाही. वैद्यकीय यंत्रणेनं ग्रामीण भागातील, वाड्यापाड्यातील महिलांपर्यंत पोहचणं जितकं गरजेचं आहे तितकंच या महिलांनीही आपल्या मनातला संकोच बाजूला सारून स्वत:साठी म्हणून डॉक्टरांकडे येणंही गरजेचं आहे.(संचालक, क्लिनिकल रिसर्च एचएससी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक) 

टॅग्स :cancerकर्करोग