शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरवर होणार आता स्वस्तात उपचार, 42 औषधांच्या किमतीत मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:17 IST

कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे.

ठळक मुद्देकॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळणार आहे.

नवी दिल्ली - कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाही. अनेक प्रकारच्या सर्जरी आणि कीमोथेरपीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करता येतात. कॅन्सरग्रस्त व्यक्तींसाठी आता एक खूशखबर आहे. कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे. ट्रेड मार्जिनमधून औषधं विक्रेता आणि होलसेलर औषधं विक्रेता जबरदस्त नफा कमवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती अधिक वाढल्या आहेत. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळणार आहे. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे.

कॅन्सर या आजारावरील उपचार खर्चिक असतात. त्यामुळे या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 मार्चपासून या नव्या किंमती लागू करण्यात येणार आहेत. ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर’, 2013 च्या पॅरा 19 चा वापर हा व्यापारातील नफा ठरविण्याकरिता सरकारने केला आहे. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू शकतील. 

एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!कॅन्सर मुळातून नष्ट होण्याचं प्रमाण फार कमी आहे. कॅन्सरबाबत जगभरात सतत वेगवेगळे शोध सुरू असतात. असाच एका शोध इस्त्राइलच्या संशोधकांनी केला आहे. या शोधात त्यांनी दावा केला आहे की, ते कॅन्सरला नष्ट करणारं असं औषध तयार करू शकतात, ज्याने कॅन्सर एका वर्षात बरा होऊ शकतो. 

बायोटेक कंपनी AEBi चा दावा

तसे तर कॅन्सरवर वेगवेगळे उपचार केले जातात. पण हा आजार मुळातून नष्ट करण्याचा दावा कुणीच करत नाही. पण इस्त्राइलच्या अ‍ॅक्सिलेरेटेड इवॉल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड (AEBi) कंपनीने हा दावा केला आहे. त्यांनी दावा केलाय की, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला ते पूर्णपणे दूर करू शकतात. 

या शोधात दावा करण्यात आला आहे की, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि पेप्टाइड्सच्या मदतीने कॅन्सरला नष्ट करणारं औषध तयार करण्यात आलं आहे. पेप्टाइट्सला अमीनो अ‍ॅसिडचं रूप मानलं जातं. सध्या या शोधात तयार करण्यात आलेलं औषध मनुष्यावर वापरण्यात आलेलं नाहीय. शोधादरम्यान या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यावरून हा दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यावर इतर संशोधकांनी टीका केली आहे.  

टॅग्स :cancerकर्करोगmedicinesऔषधंMedicalवैद्यकीय