शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

अतिरिक्त ताणामुळे महिलांना येतोय अकाली मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:22 IST

सर्वच आघाड्यांवर लढताना महिलांना सावधानतेचा इशारा

ठळक मुद्देताणामुळे महिलांचं आयुष्य होतंय कमी.ताण कमी करण्याचे प्रयत्न महिलांनी करायला हवेत.सगळ्याच आघाड्यांवर लढताना महिलांनी घ्यावी काळजी.

- मयूर पठाडेआजच्या काळात महिलांवर कामाची जबाबदारी इतकी वाढली आहे की खरंच अक्षरश: कशाशीही त्याची तुलना करता येणार नाही. प्रत्येक आघाडीवर महिला लढताहेत. अतिशय समर्थपणे लढताहेत. पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटींनी त्यांच्यावर कामाचा नुसता बोजाच वाढला नाही, तर तो बोजा समर्थपणे रेटण्याचं आव्हान आणि कर्तव्यही त्यांच्यावर आपोआप लादलं गेलं आहे.महिलांनी घराचा उंबरा ओलांडला आणि बाहेरचीही जबाबदारी त्यांनी घ्यायला सुरुवात केली. असं असलं तरी कोणत्याच आघाडीवर त्यांची जबाबदारी कमी झाली नाही, उलट ती वाढलीच. शिवाय प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट, व्यवस्थितच झाली पाहिजे, कोणतीच कमतरता त्यात राहायला नको याचं सततचं प्रेशरही वाढलं.महिला खरोखरच सुपर वुमन झाल्या. त्या तुलनेत पुरुषांवरीची जबाबदारी एवढी वाढली नाही. महिलांवरचं परफॉर्मन्स प्रेशर मात्र दिवसेंदिवस वाढतच गेलं. आता तर ते इतकं वाढलं आहे की त्यांच्या आयुष्यावरच त्याचं प्रश्नचिन्ह उमटतं आहे.नुकत्याच झालेल्या संशोधनानं त्यावर शिक्कामोर्तब करताना महिलांचा धोक्याचा इशारा दिला आहे. ओटावा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात विस्तृत अभ्यास केला आणि त्यावर आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अतिरिक्त ताणाच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस महिला दबल्या जाताहेत. त्या ताणाचा त्यांच्या शरीर, मनावर तर परिणाम होतो आहेच, पण त्यांचं आयुष्यही कमी होतंय. अनेक महिलांचं आयुष्य ताणामुळे कमी होताना त्यांना अकालीच मृत्यू येतोय. आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी महिलांवरील ताण कमी झाला पाहिजे आणि महिलांनीही त्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले पाहिजेत, प्रत्येक आघाडीवर लढताना काही काळ विश्रांतीही घेतली पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा कळकळीचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.