शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी रोज खा 'हे' फूड्स, त्वचा होईल तजेलदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:56 IST

नेहमी तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल.

बरेच लोक जास्त काळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. कुणाला यातून फायदा मिळतो तर कुणाला नाही. तुम्हालाही जर नेहमीच तरूण आणि सुंदर दिसायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक तत्वांचा समावेश करावा लागेल. यातून तुमच्या शरीराला पोषण मिळेल आणि तुमची त्वचा आतून सुंदर होईल.

एक्सपर्ट सांगतात की, जर त्वचा आतूनच निरोगी राहिली तर तुम्हाला वरून वेगवेगळे केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याची गरजच पडणार नाही. वय आणि वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या कुणी थांबवू शकत नाही. पण काही खाद्य पदार्थ असे असतात जे त्वचा नेहमी निरोगी ठेवतात आणि तुम्हाला ऑक्सिडेटिव तणावापासून वाचवण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला तीन अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत जे त्वचा जास्त काळ तरूण आणि तजेलदार ठेवतात.

ढोबळी मिरची

लाल शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरचीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात जे वय वाढण्याची प्रक्रिया हळुवार करतात. तसेच लाल ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतात जे कोलेजन उत्पादनासाठी फार फायदेशीर असतात. यात कॅरोटीनॉयड नावाचं शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे त्वचेसाठी फार चांगले असतात.

रताळे

रताळ्याला रंग बीटा-कॅरोटीन नावाच्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे येतो जो व्हिटॅमिन ए सोबत परिवर्तित होतो. याने त्वचेचा लवचिकपणा कायम राहतो आणि त्वचेच्या कोशिकाही निरोगी राहतात. हे एक स्टार्चयुक्त कंदमूळ आहे. यात व्हिटॅमिन सी आणि ई सुद्धा भरपूर असतात. हे दोन्ही पोषक तत्व त्वचेला निरोगी ठेवतात.

पालक

पालक भाजी सगळ्यात पावरफुल भाजी मानली जाते. यात भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंस असतात. या सुपरफूड मानल्या जाणाऱ्या भाजीमधून आरोग्याला खूपसारे फायदे मिळते. जसे की, ऑक्सीडेटिव तणाव कमी करणारे, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणारे तसेच कॅन्सर सेल्स रोखणारे तत्वही या भाजीत असतात. या भाजीमुळे त्वचाही चांगली राहते.

पाणी

त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यासाठी पाणी फार महत्वाचं असतं. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं. पाण्यात अनेक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. त्वचा तरूण, निरोगी आणि चमकदार दिसते. त्यामुळेच दिवसभर कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी प्यावे.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स