शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Doctors Day: कोरोनाच्या काळात डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 04:45 IST

मागच्या काही वर्षांत डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता समाजात डॉक्टरांविषयी आदराची भावना राहिलेली नाही, असा समज निर्माण झाला होता.

ओमकार गावंड

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देशातील नागरिकांना आरोग्य व्यवस्थेबद्दलचे महत्त्व कळले. या कठीण काळात सर्वात महत्त्वाची भूमिका ही डॉक्टरांनी पार पडली. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये अनेक डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. तरीही डॉक्टर एखाद्या योद्ध्याप्रमाणे कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सामील झाले आहेत. डॉक्टर या पेशाबद्दल स्वत: डॉक्टरांना काय वाटत आहे, तसेच या कठीण काळात ते कशा प्रकारे कामगिरी बजावत आहेत? याबद्दल विविध शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलेल्या भावना...डॉक्टरांना आपल्या समाजात देवदूत समजले जाते आणि आज त्याची खरेच प्रचिती येत आहे. आज एक जबाबदार नागरिक आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय सेवक म्हणून देशाप्रति आमचे एक कर्तव्य आहे. आज सारा समाज हा आशेच्या नजरेने डॉक्टरांना देवाच्या रूपात पाहत आहे. त्या सर्वांना या संकटातून बाहेर काढून स्वत:ची काळजी घेत राष्ट्र जगविणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आम्ही चोख पार पाडत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. या तणावाच्या परिस्थितीत डॉक्टरसुद्धा मानसिक तसेच शारीरिक तणावाचे बळी होत आहेत. नागरिकांनी त्यांची काळजी घेत घरीच थांबायला हवे. - डॉ. राहुल वाघ, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र

एखादा रुग्ण जेव्हा बरा होऊन जातो तेव्हा जग जिंकल्याचा आनंद होतो. डॉक्टर बनून आपण एखाद्याला जीवदान देतो यापेक्षा सुखावणारी गोष्ट जगात कुठलीच नाही. कोरोना आल्यापासून आम्ही सर्व डॉक्टर भरपूर कष्ट करून रुग्णसेवा करत आहोत. पीपीई किट हा शब्द कधी ऐकलाही नव्हता, परंतु आता तेच किट घालून काम करावे लागत आहे. सरकारकडूनही आम्हाला खूप मदत व चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक डॉक्टर कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रेसर होतो आणि पुढेही राहणार. - डॉ. शारिवा रणदिवे,जनरल सेक्रेटरी, सेंट्रल मार्डमागच्या काही वर्षांत डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता समाजात डॉक्टरांविषयी आदराची भावना राहिलेली नाही, असा समज निर्माण झाला होता. या हल्ल्यांमुळे अनेक डॉक्टरांनी डॉक्टरी पेशालाच रामराम ठोकला. अनेकांचा कल हा रेडिओलॉजी व डरमॅटोलॉजीकडे जाऊ लागला. मागील चार महिने कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व डॉक्टर जोमाने काम करत आहोत. या काळात सोशल मीडियामार्फत लोकोपयोगी माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात समाजाच्या सर्व स्तरांतून डॉक्टरांना भरपूर आदर मिळाला. त्यामुळे समाजाचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ही भावना मनात निर्माण झाली. - डॉ. दीपक मुंढे, अध्यक्ष, के.ई.एम. मार्ड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर