शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विस्मरण होतंय? काहीच लक्षात राहात नाही? -आहारात ओमेगा थ्री अँसिडचा समावेश करा..

By admin | Updated: May 23, 2017 14:49 IST

अल्झायमरसारख्या मेंदूच्या विकारापासून वाचायचं असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात..

 - मयूर पठाडे

 
आपला आहार हेच अतिशय उत्तम असं रोगप्रतिबंधक औषध आहे आणि भविष्यात होऊ शकणार्‍या आजारांना आजच प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या आहार-विहाराकडे लक्ष दिलं पाहिजे हे शेकडो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेदानं सांगितलेलं सत्य आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर पुन्हा तावूनसुलाखून निघत आहे.
आजकाल अनेक जण अल्झायमरच्या आजारानं त्रस्त झालेले आपल्याला दिसतात. मेंदूच्या संदर्भात हा आजार आहे. विस्मरण होणे, स्मृती नष्ट होणे, पटकन विसरून जाणे. यासारख्या गोष्टी या आजारामुळे होतात. 
 
पण का होतो हा आजार?
आपल्या आहारातून पुरेसे अन्नघटक आपल्याला मिळाले नाहीत, तर विविध प्रकारचे आजार आपल्याला होतात. अल्झायमरच्या बाबतीतही अनेक कारणं असली तरी तुमचा आहार जर व्यवस्थित असला, विशेषत: तुमच्या आहारातून जर तुम्हाला पुरेसे ओमेगा थ्री अँसिड मिळत असेल तर भविष्यातील अल्झायमरचा धोका निश्चित टळू शकतो हे आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. 
 
 
 
कशातून मिळतं ओमेगा थ्री अँसिड?
अक्रोड, मासे, अंबाडीच्या बिया, सायाबिन, पालक यासारख्या अन्नघटकांमध्ये ओमेगा थ्री अँसिडचं प्रमाण चांगलं असतं. हे अन्नघटक जर पुरेशा प्रमाणात खाल्ले गेले तर अल्झायमरच्या आजारातून वाचता येईल असं हे नवं संशोधन सांगतं. 
अल्झायमरमुळे तुमच्या स्मृतीचा तर नाश होतोच, पण मेंदुची अनेक कार्यंदेखील त्यामुळे विस्कळीत होतात. शास्त्रज्ञांना ओमेगा थ्री अँसिड आणि अल्झायमर यांच्यात खूप जवळचा संबंध दिसून आला. 
अनेक लोकांवर त्यांनी प्रयोगही केले. ज्यांच्या शरीरात ओमेगा थ्री अँसिडचं प्रमाण कमी आहे, त्यांना अल्झायमरचा धोका वाढतो हे या संशोधनात दिसून आलं.
 
ओमेगा थ्री अँसिडचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मेंदूतील स्मृती आणि शिक्षणाच्या संदर्भातील जी केंद्रे आहेत, तेथील रक्तपुरवठा वाढवणं. त्यामुळे साहजिकच ही केंद्रे कार्यक्षम राहतात आणि अल्झायमरसारखे विकार डोकं वर काढत नाहीत. 
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात ओमेगा थ्री अँसिड आणि तुमच्या भावभावना यांचाही जवळचा संबंध आहे असं आढळून आलं.
त्यामुळे कुठल्याही आजारापासून तुम्हाला वाचायचं असेल तर आधी आहारासंदर्भातील आपली लाइफस्टाइल बदला आणि भविष्यातही आपला मेंदू कार्यरत ठेवायचा असेल तर फक्त आपल्याखाण्यापिण्याकडे थोडंसं लक्ष द्या.
बस्स. एवढंच.