शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रात्री झोप येत नाही? मधे खूपदा उठावं लागतं?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:18 IST

..मग नैराश्य तुमचं दार ठोठावत असू शकतं!..

ठळक मुद्देअगोदर रात्री अधूनमधून जाग येण्यापासून सुरू होते.हा त्रास वाढल्यानंतर त्याचं निद्रानाशात रुपांतर होतं.वेळच्या वेळी उपाय केले नाहीत, तर तुमची मानसिक स्थिती बिघडून नैराश्यही येऊ शकतं.

- मयूर पठाडेतुम्ही रोज कष्टाचं काम किती करता?.. हे विचारतोय ते दोन कारणांसाठी. तुम्ही रोज इतके कष्ट करता का, की ज्यामुळे तुम्हाला रात्री गादीवर पडल्या पडल्या झोप येते? आणि दुसरं, तुम्ही खरंच इतकं काम करता का, की त्या थकव्यामुळे तुम्हाला झोपच येत नाही..झोपेशीच निगडित, पण दोन अतिशय भिन्न भिन्न अशा या गोष्टी आहेत. रात्री गादीवर पडल्या पडल्या तुम्हाला झोप येत असेल, तर ते चांगलंच आहे, पण खूप थकल्यामुळे झोपच येत नाही, असंही बºयाचदा होतं. त्यामुळे खूप थकलेलं असूनही आपल्याला झोप येत नाही. हे असं जर नियमितपणे, नेहमीच होत असेल, तर मात्र ते खूपच घातक आहे.खूप थकल्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल, तर तुमचे मूड सारखे बदलतात. चिडचिडही वाढते. झोप व्यवस्थित होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही सुरू होतात.अनेक जण झोप लागत नसल्याच्या तक्रारी करतात, पण त्याकडे गांभीर्यानं कोणीही पाहात नाही. पण त्याचे दुष्परिणाम नंतर वाढत जातात. अगोदर रात्री अधूनमधून जाग येण्यापासून सुरू होते. मधेच झोप डिस्टर्ब होते. मग तुम्ही मध्यरात्री केव्हातरी उठता. हा त्रास वाढल्यानंतर मग त्याचं निद्रानाशात रुपांतर होतं. अनेकदा ‘आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अपेना’ हा आजारही तुम्हाला होऊ शकतो. या दोन्ही प्रकारांत आपण वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्यावर उपाय केले नाहीत, तर तुमची मानसिक स्थितीही त्यामुळे हळूहळू बिघडत जाते आणि तुम्ही नैराश्याचे शिकार होता. सततच्या नैराश्यामुळे अर्थातच तुमच्या आरोग्यावर आणि जगण्यावरच विपरित परिणाम होतात. त्यामुळे झोपेची समस्या असेल तर वेळीच काळजी घ्या.या संदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष पाहू या पुढच्या भागात..