शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राग मनात ठेवून झोपी जाऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:33 IST

वैज्ञानिकांच्या एका चमूने केलेल्या संशोधनानुसार मनात राग किंवा चीड ठेवून झोपी गेल्याने त्या भावना लवकर विसरता येत नाही.

झोप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप झाल्यावर कसे प्रसन्न वाटते! पण तुम्हाला माहित आहे का की, झोपेमुळे नकारात्मक भावना दीर्घकाळासाठी आपल्या मनात घर करून बसतात? वैज्ञानिकांच्या एका चमूने केलेल्या संशोधनानुसार मनात राग किंवा चीड ठेवून झोपी गेल्याने त्या भावना लवकर विसरता येत नाही.चीन आणि अमेरिकेतील संशोधकांनी मिळून केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, वादविवाद झाल्यावर लगेच झोपी गेल्याने त्याची नकारात्मक आठवण मनात कोरली जाते. त्यामुळे झोपण्याआधी तुमचे कोणाशी भांडण झाले असेल किंवा खूप राग आला असेल तर तो शांत करून झोपण्याचा सल्ला संशोधनाच्या सहलेखिका युन्झे लिऊ यांनी दिला.लिऊ आणि सहकाऱ्यांनी ७३ कॉलेज विद्यार्थ्यांना या संशोधनात सहभागी करून घेतले होते. झोपेचा स्मरणशक्तीवर कसा परिणाम होता याचा ते अभ्यास करत होते. काही विशिष्ट चित्रांशी नकारात्मक आठवणी जोडण्याचे त्या विद्यार्थ्यांना दोन दिवस प्रशिक्षण दिले गेले. मग त्यांना पुन्हा हे चित्र दाखवून त्या नकरात्मक भावना आठवा किंवा त्या विसरून जाण्यास सांगितले. शांत झोपादोन वेळा हा प्रयोग करण्यात आला. एकदा सर्व विद्यार्थ्यांची झोप झाल्यावर आणि एकदा प्रशिक्षणानंतर केवळ अर्ध्या तासाने. दरम्यान त्यांच्या मेंदूचे स्कॅन करणे चालूच होते. रात्री झोप घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना नकरात्मक भावना विसरणे जरा जड गेल्याचे दिसून आले. स्कॅनिंगमधून स्पष्ट झाले की, त्या नकारात्मक भावना लाँग-टर्म मेमरीच्या भागात साठवलेल्या होत्या.या संशोधनामुळे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डरच्या (पीटीएसडी) रुग्णांवर परिणामकारक उपचार करण्यास खूप मदत होणार आहे.