शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2017 : ​दिवाळीत मौज-मस्तीबरोबरच आरोग्यही सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 14:34 IST

दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.

-रवींद्र मोरे सण-उत्सव आले म्हणजे विविध खाद्यपदार्थांची मेजवानी आलीच आणि भारतीय सण तर स्वादिष्ट खाद्यान्नांशिवाय अपूर्णच आहेत. त्यातच दिवाळीला तर आपण सर्वचजण मौज-मस्तीबरोबरच मिठाई आणि विविध चविष्ठ पदार्थांना प्राधान्य देतो.  दिवाळीदरम्यान जास्त प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन केल्याने मात्र वजन वाढण्याबरोबरच इतर आरोग्याच्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत मौज-मस्ती बरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.  * दिवसभराचे नियोजन करावे सणासुदीच्या दिवसात बऱ्याचदा आपले मित्र-नातेवाईकांकडे येणे-जाणे सुरु असते, त्यामुळे बऱ्याचप्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन होते. यापासून बचावासाठी आपण संपूर्ण दिवसाचे नियोजन करायला हवे. जर रात्री दिवाळीच्या पार्टीत जायायचे असेल तर आपला ब्रेकफास्ट आणि दुपारचे जेवण अगोदरच हलके असावे आणि पार्टीला जाण्याअगोदर काही हेल्दी स्रॅक्स सेवन करून जावे, जेणेकरुन पोट भरलेले राहील. पार्टीच्या ठिकाणी हेवी आणि रिच पदार्थ सेवन करणे टाळावे.   * घरात बनलेल्या मिठाई  बाजारात बनविलेल्या मिठाईमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. याशिवाय यात अतिरिक्त कृत्रिम रंग आणि मेटानिल येलो, लेड नाइट्रेट, म्यूरिएरिक अ‍ॅसिडसारखे हानिकारक रसायनेदेखील असतात. यामुळे मोठ्याप्रमाणात शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. यासाठी घरातच बनलेल्या मिठाईंचे सेवन करणे आरोग्यदायी ठरेल.  * आरोग्यदायी स्रॅकिंग  बऱ्याचदा आपण दिवाळीदरम्यान गोड पदार्थांबरोबरच मीठ आणि वसायुक्त पदार्थही मोठ्याप्रमाणात सेवन करतो. याचाही परिणाम आरोग्यावर होतो. यासाठी या पदार्थांना आरोग्यदायी ट्विस्ट देण्यासाठी बनविण्याच्या पद्धतीत बदल करणे हा देखील एक चांगला उपाय ठरु शकतो. जसे की, तळण्याऐवजी बेक करावे. बेक केलेल्या चकल्या आणि पुड्या, कमी वसायुक्त खाखरा आणि भाजलेला चिवडा आदी पदार्थ चविष्ट तर असतातच शिवाय स्वास्थवर्धकही असतात.   * भरपूर पाणी या दिवसात भरपूर धावपळ असल्याने आपण बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करत नाही. पाण्याच्या कमतरतेने थकवा आणि कमजोरी येते. तसेच हा थकवा घालविण्यासाठी बऱ्याचदा गोड सरबत आणि एरियेटिड ड्रिंक्स सेवन करतो. त्यामुळे वेगाने वजन वाढते आणि आरोग्यही खराब होते.     * खाद्यपदार्थांवर नियंत्रण विशेष खाद्यपदार्थ फक्त अशा सणासुदीच्या दिवसातच तयार केले जातात. बऱ्याचदा आनंदाच्या या प्रसंगी मोठ्याप्रमाणात या पदार्थांचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले जाते. त्यामुळे साहजिकच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.  *  मिठाईचा कालावधीही घ्या लक्षात  बऱ्याचदा आपण दिवाळीनिमित्त मिठाई जास्त प्रमाणात बनवितो. त्यात मिठाई दूध आणि क्रीमपासून बनलेल्या असतात. ज्या जास्त दिवस साठवण केल्याने खराब होतात. अशा मिठाईंचे सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी उरलेल्या मिठाई आपण आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना वाटू शकतात. ज्यामुळे त्यांच्याही आनंदात वाढ निर्माण होईल.