शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

रोज चालता का तुम्ही १०,००० पावलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 17:56 IST

नाही? मग करा की सुरू हळूहळू..

ठळक मुद्देशास्त्र सांगतं, सर्वसाधारण माणसानं रोज दहा हजार पावलं चालायला पाहिजे.सर्वसाधारणपणे दोन हजार पावलांचं अंतर होतं सुमारे १.६ किलोमीटर. दहा हजार पावलं म्हणजे रोज साधारण आठ किलोमीटर!रोज तुम्ही आठ किलोमीटर अंतर चालत असाल, तर तुमचं सर्वांगीण आरोग्य, तुमचं हृदय आणि तुमचं वजन आटोक्यात आणि मापात ठेवण्यासाठी ते पुरेसं आहे..

- मयूर पठाडेव्यायाम सुरू करा, फिरायला जात जा.. असं डॉकटरांनी सांगितलं आणि त्याहीपेक्षा आपली तब्येत कुरकुर करायला लागली, उठता बसता कुठली ना कुठली दुखणी सतावायला लागली की मग आपल्याला खरोखरच वाटायला लागतं, हो, आपण व्यायाम करायलाच पाहिजे. बºयाचदा व्यायामाची ही सुरुवात होते चालण्यापासून. ते योग्यही आहे. अर्थात त्याचीही बरीच काळजी घ्यावीच लागते. म्हणजे तुम्ही कुठे चालतात, कोणत्या ठिकाणी चालतात, त्याची वेळ, पायात कोणते शूज तुम्ही घातले आहेत.. अशा अनेक गोष्टींचा आणि आपल्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे.चालायचं हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण किती चालायचं?.. कोणालाच त्याविषयी काहीच सांगता येत नाही. प्रत्येक जण मग आपल्या मनाप्रमाणे आपलं स्वत:चं प्रमाण ठरवून टाकतो.आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी आणि वेट लॉससाठी चालायलाच पाहिजे.पण किती?शास्त्र सांगतं, सर्वसाधारण माणसानं रोज दहा हजार पावलं चालायला पाहिजे.तुम्हाला वाटेल, सोप्पं आहे, म्हणजे त्यात फार कठीण असं काही नाहीच, पण मनानं ठाम ठरवल्याशिवाय ते सहजपणे जमणंही शक्य नाही.तुम्ही रोज किती चालता, हे पाहण्यासाठी तुमच्याकडे पेडोमीटर असलं तर ठीकच आहे, पण दहा हजार पावलं म्हणजे नेमकं किती अंतर?सोप्पं करूनच सांगतो..सर्वसाधारणपणे दोन हजार पावलांचं अंतर होतं सुमारे १.६ किलोमीटर. दहा हजार पावलं म्हणजे रोज साधारण आठ किलोमीटर!रोज तुम्ही जर साधारण आठ किलोमीटर अंतर चालत असाल, तर तुमचं सर्वांगीण आरोग्य, तुमचं हृदय आणि तुमचं वजन आटोक्यात आणि मापात ठेवण्यासाठी ते पुरेसं आहे..मग करता सुरू? उद्यापासून?..नक्की, पण आधी गाडी हळूहळूच चालू द्या. हजार पावलं, दोन हजार पावलं.. मग पुढचा पल्ला गाठा..