शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

दिवाळीत खूप खाणं झालंय ? मग आजपासुनच सुरु करा डिटॉक्स डाएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:34 IST

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते.

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते. याचाच अर्थ बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स डाएटचा आजपासूनच समावेश करा. जसे आजकाल सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्यासाठी डिजीटल डिटॉक्स चा ट्रेंड आहे त्याप्रमाणेच कधीतरी बॉडी डिटॉक्स करायला हरकत नाही. डिटॉक्स डाएटचा फायदासोप्या भाषेत सांगायचे तर डिटॉक्स डाएट पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. सलग काही दिवस तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर हे डाएट शरीर डिटॉक्स करते. तुमचे यकृत, आतडे यांची कार्यक्षमता सुरळीत ठेवणे, त्यांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ न देणे यासाठी शरीर डीटॉक्स व्हायला हवे. थोडक्यात काय तर शरीर निरोगी राखण्यासाठी अधूनमधून त्याला डिटॉक्स होऊ देणे गरजेचे आहे. 

 डिटॉक्स डाएट कसे करतात

डिटॉक्स हे नाव कितीही फॅन्सी वाटत असले तरी हे बाकी डाएटसारखे अवघड अजिबातच नाही. दैनंदिन जीवनात ज्या आहाराचा समावेश असतो तोच आहार यामध्ये घ्यायचा आहे. प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. जेणेकरुन शरीराला आरामही मिळतो आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.डिटॉक्स डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करावा

डिटॉक्स वॉटरअगदी घरी बनवता येईल असे हे पाणी आहे. तुळस, पुदिना, आलं, लिंबू हे नैसर्गिक पदार्थ शरीराला डिटॉक्स करतात. या पदार्थांचा रस पिणे शरीरासाठी उत्तम आहे. यामुळे पचनाचेही आजार होत नाही उलट शरीर संतुलित राखण्यास मदत करते. ज्यांना पाणी प्यायचे नाही त्यांनी केवळ तुळशीची पानं किंवा लिंबाची फोड किंवा आवळ्याचा तुकडा घेतला तरी चालेल.

भाज्यांचे सूप 

दिवाळीत थंडी सुरु झाली की गरम सूप पिण्याची इच्छा होते. अशावेळी भाज्या स्वच्छ धुऊन, शिजवून बनवलेले सूप आरोग्यासाठी लाभदायक आहे. पालेभाज्या, कॉर्न यांचे सूप नियमित प्यायले तर शरीर निरोगी राहील. 

नारळ पाणी 

नारळ पाणी हे कधीही शरीरासाठी हितकारकच आहे. नारळ पाणी शरिरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. यामुळे तुमचे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.