शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत खूप खाणं झालंय ? मग आजपासुनच सुरु करा डिटॉक्स डाएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:34 IST

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते.

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते. याचाच अर्थ बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स डाएटचा आजपासूनच समावेश करा. जसे आजकाल सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्यासाठी डिजीटल डिटॉक्स चा ट्रेंड आहे त्याप्रमाणेच कधीतरी बॉडी डिटॉक्स करायला हरकत नाही. डिटॉक्स डाएटचा फायदासोप्या भाषेत सांगायचे तर डिटॉक्स डाएट पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. सलग काही दिवस तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर हे डाएट शरीर डिटॉक्स करते. तुमचे यकृत, आतडे यांची कार्यक्षमता सुरळीत ठेवणे, त्यांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ न देणे यासाठी शरीर डीटॉक्स व्हायला हवे. थोडक्यात काय तर शरीर निरोगी राखण्यासाठी अधूनमधून त्याला डिटॉक्स होऊ देणे गरजेचे आहे. 

 डिटॉक्स डाएट कसे करतात

डिटॉक्स हे नाव कितीही फॅन्सी वाटत असले तरी हे बाकी डाएटसारखे अवघड अजिबातच नाही. दैनंदिन जीवनात ज्या आहाराचा समावेश असतो तोच आहार यामध्ये घ्यायचा आहे. प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. जेणेकरुन शरीराला आरामही मिळतो आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.डिटॉक्स डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करावा

डिटॉक्स वॉटरअगदी घरी बनवता येईल असे हे पाणी आहे. तुळस, पुदिना, आलं, लिंबू हे नैसर्गिक पदार्थ शरीराला डिटॉक्स करतात. या पदार्थांचा रस पिणे शरीरासाठी उत्तम आहे. यामुळे पचनाचेही आजार होत नाही उलट शरीर संतुलित राखण्यास मदत करते. ज्यांना पाणी प्यायचे नाही त्यांनी केवळ तुळशीची पानं किंवा लिंबाची फोड किंवा आवळ्याचा तुकडा घेतला तरी चालेल.

भाज्यांचे सूप 

दिवाळीत थंडी सुरु झाली की गरम सूप पिण्याची इच्छा होते. अशावेळी भाज्या स्वच्छ धुऊन, शिजवून बनवलेले सूप आरोग्यासाठी लाभदायक आहे. पालेभाज्या, कॉर्न यांचे सूप नियमित प्यायले तर शरीर निरोगी राहील. 

नारळ पाणी 

नारळ पाणी हे कधीही शरीरासाठी हितकारकच आहे. नारळ पाणी शरिरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. यामुळे तुमचे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.