शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

डायबिटीसमुळे डोळे जातील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:33 IST

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने डायबिटीसचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. डायबिटीसमुळे दृष्टी कमी होणे आणि काही वेळा दृष्टी कायमस्वरूपी जाण्याची भीती आहे. 

डॉ. प्रीतम सामंत, रेटिना स्पेशालिस्ट, हिंदुजा हाॅस्पिटल -ही दिवसांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशातील नागरिकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहे, याबद्दल लॅन्सेटमध्ये शोधनिबंध सादर केला होता. डायबिटीसचा शरीरातील सर्व अवयवांवर दुष्परिणाम दिसून येतो. आपल्याकडे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक झाल्यावर डॉक्टरकडे जाण्याची धावपळ सुरू होते. विशेष म्हणजे अनियंत्रित साखरेच्या प्रमाणामुळे डोळ्याला रेटिनोपॅथी नावाचा आजार होऊन दृष्टी कमी होणे आणि काही वेळा दृष्टी कायमस्वरूपी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात येतात आणि काहीही करून डोळा वाचवा, असे सांगतात. परंतु, त्यावेळी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. डोळ्याला मोठ्या प्रमाणात इजा झालेली असते. या गोष्टी टाळायच्या असतील तर ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे, त्यांनी वर्षातून किमान दोन वेळा डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळे तपासू नये. त्या दुकानात असणारे तज्ज्ञ डोळ्याच्या आजाराची माहिती देऊ शकत नाहीत. कारण ते त्यामधील तज्ज्ञ नसतात. केवळ डोळ्यात टॉर्च मारून या आजाराचे निदान करता येत नाही. याकरिता डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे. रेटिनाचा (दृष्टिपटल) आजार तुम्हाला जडला आहे की नाही, हे पाहण्यासाठी डोळ्यांमध्ये औषध टाकून वैद्यकीय भाषेत ज्याला बुबुळ डायलेट करून बघितले जाते आणि त्यानंतर रेटिना स्पेशालिस्ट डोळ्यातील रेटिना किती खराब झाला आहे, हे सांगू शकतो. 

‘हे’ लक्षात घेतले पाहिजेकाही डायबिटीस रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात डॉक्टरकडे येतात. त्यावेळी डोळ्यांतील रक्तवाहिन्या फुटून डोळ्यांमध्ये गाठ तयार होते. त्यामुळे रेटिनाच्या पडद्याला सूज येते. या अशा परिस्थितीत रुग्णांची नजर खूपच कमी झालेली असते. त्यावेळी मात्र अशा रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. 

आपण या ठिकाणी रेटिनोपॅथीच्या आजारात एक लक्षात घेतले पाहिजे, या आजारात आहे ती नजर वाचविण्यास मदत होते. गेलेली नजर परत येत नाही. कॅटरॅक्टचे ऑपरेशन केल्यानंतर रुग्णांना चांगली नजर येते. 

या आजारात तसे होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे डायबिटीसचा आजार असणाऱ्या रुग्णांनी वेळच्या वेळी डोळे तपासून निदान करून उपचार घेतले, तर डोळ्याची नजर चांगली ठेवण्यास मदत होते.

अनेकवेळा या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवून डोळ्याची नजर वाचविता येणे शक्य असते. डोळ्यात फार तर काही ड्रॉप्स टाकावे लागतात.मात्र, काही रुग्ण या आजाराच्या ‘मिडल स्टेज’ला येतात. त्यावेळी काही चाचण्या कराव्या लागतात. त्यामध्ये डोळ्यांची अँजिओग्राफी आणि डोळ्यांचा स्कॅन ज्याला आम्ही ओसीटी स्कॅन म्हणतो. या दोन तपासण्यांनंतर रेटिना किती खराब झाला आहे, हे समजते. त्यानंतर त्या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णांना डोळ्यात इंजेक्शन घ्यावी लागतात. सुरुवातीच्या काळात दर महिन्याला त्यानंतर ती कमी करत बंद केली जातात. यामुळे आहे ती नजर वाचविण्यात मदत होते. इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया ही दहा मिनिटांत पार पडते. त्यासोबत काही वेळा लेसरचे उपचार घ्यावे लागतात.

टॅग्स :diabetesमधुमेहeye care tipsडोळ्यांची निगा