शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

​प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोक्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:16 IST

सध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते.

-Ravindra Moreसध्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिण्याचे फॅड वाढतच चालले आहे. लांब प्रवास करायचा असेल किंवा जास्त पाणी पिण्याच्या सवयीमुळे प्लास्टिकची बॉटल आपल्या बॅगेत नेहमी पाहावयास मिळते. मात्र एका संशोधनानुसार प्लास्टिकच्या बॉटलचा प्रयोग करणे आरोग्यासाठी खूपच अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. जर आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पित असाल तर आपणास कॅन्सर, मधुमेह, हृदय रोग हे आजार तसेच गर्भवती आई व तिच्या मुलाला धोका आहे. त्याशिवाय अजून धोकादायक आजार होऊ शकतात. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कित्येक हानिकारक केमिकल्स असतात जे गरम झाल्यानंतर पाण्यात मिक्स होतात आणि तेच पाणी पिल्याने पाण्याबरोबर  पोटात गेलेल्या हानिकारक केमिकल्समुळे आपल्या शरीराला हानी पोहचते.कॅन्सर कॅन्सर तज्ज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिल्याने कॅन्सर होऊ शकतो. प्लास्टिकची बॉटल जेव्हा उन्हामुळे किंवा जास्त तापमानामुळे गरम होते तेव्हा प्लास्टिकमधले हानिकारक केमिकल डायआॅक्सिन वितळून पाण्यात मिक्स होते. हे पाणी पिल्याने पाण्यात मिक्स झालेले डायआॅक्सिन केमिकल आपल्या शरीरात प्रवेश करते. त्यानंतर आपल्या शरीरातील पेशींवर डायआॅक्सिन खूपच वाईट परिणाम करते. त्यामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. मेंदूवर प्रतिकूल परिणामप्लास्टिकच्या बॉटलमध्ये प्रयोग करण्यात आलेल्या ‘बाइसफेनोल ए‘ मुळे मेंदूच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे मनुष्याची समजण्याची आणि स्मृतीची क्षमता कमी कमी होत जाते.  अपचन व अ‍ॅसिडिटी प्लास्टिकची बॉटल बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘बाइसफेनोल ए’ मुळे पोटावरदेखील प्रतिकूल परिणाम होतो. बीपीए नावाचे केमिकल जेव्हा पोटात पोहोचते तेव्हा पचनक्रियादेखील प्रभावित होते. यामुळे केलेले जेवण व्यवस्थित पचन नाही आणि पोटात गॅस निर्माण होऊन अ‍ॅसिडिटी होते. पोटाचे विकारगेल्या काही महिन्यांपासून आपण एकाच बॉटलमध्ये पाणी पित असाल आणि ती बॉटल वेळोवेळी स्वच्छ धुतली नसेल तर त्यात बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे  आपणास हमखास पोटाचे विकार होतील. आणि याचा विपरीत परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. मुलांमध्ये होऊ शकतो जन्म दोषबॉटल बनविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल हे भ्रूणामध्ये असामान्य गुणसूत्र निर्माण करु शकते, ज्यामुळे मुलांमध्ये जन्म दोष होऊ शकतो. तसेच गर्भावस्थेदरम्यान बॉटलमधील पाण्याचे नेहमी सेवन होत असेल तर जन्माला येणाºया बाळाला भविष्यात प्रोस्ट्रेट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.  गर्भपात होण्याचा धोकाप्लास्टिकच्या बॉटलमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे गर्भपाताचा धोका वाढतो. विशेषत: ज्या महिलांना गरोदर व्हायला काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा ज्यांचे अगोदर पहिल्यांदा मिसकॅरेज झाले असेल त्या महिलांनी प्लास्टिकच्या बॉटलमधले जास्त पाणी प्यायला नकोय. अशा पाण्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटदेखील कमी होते. कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर टाळाबहुतेक लोक पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला विक्री होत असलेल्या स्वस्त बॉटल खरेदी करतात. असे कदापी करु नये, कारण या बॉटल बनविताना रसायनांचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, गरम झाल्यानंतर ही रसायने पाण्यात मिक्स होतात, जी शरीरासाठी खूपच धोकेदायक ठरु शकतात.