शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Fact Check : घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य

By manali.bagul | Updated: January 27, 2021 14:26 IST

Fact Check : घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत. 

अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. गेल्या  सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर घश्यातील वेदना किंवा कोरडा पडल्यानं कोरोना संसर्गाचा धोका वाढतो अशी पोस्ट व्हायरल होत आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत. 

नवीन विषाणू घातक आहे. त्यामुळे या काळात तुमच्या घशाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमचा घसा कोरडा पडू देऊ नका. सतत पाणी पीत रहा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये विषाणू प्रवेश करू शकणार नाही.' असा दावा या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला होता. परंतू ही माहिती खोटी असल्याचे समोर आलं आहे. 

पोस्टमागचं सत्य

थायलंडच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य संचालक डॉ. सुथात छोटानापन यांनी सांगितले की, 'घसा कोरडा  झाल्याने व्हायरस शरीरात प्रवेश करतात हे म्हणणं चुकीचं आहे. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. तसंच आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहीती  दिलेली नाही.

चुलालॉंगकोर्न विद्यापीठातील रोग प्रतिबंधक आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील साहाय्याक प्राध्यापक  डॉ. थिरा वोराटानारात यांनी सांगितले की, ''कोरडा घसा आपल्या शरीरातील व्हायरस वाढण्यास कारणीभूत ठरत नाहीत. घशाद्वारे व्हायरस शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. पेशींद्वारे व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतात. म्हणून घसा कोरडा पडला तर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे ही या मेसेजमध्ये सांगितलेली गोष्ट खरी नाही.''

भारतात का वेगाने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?, समोर आलं मोठं कारण

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरात आता दिवसाला सरासरी ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.  भारतात कोरोनाच्या संसर्गाच्या वाढलेल्या वेगामागचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या वेगामागे कोरोना विषाणूचे सर्वात संसर्गजन्य प्रतिरूप A2a आहे. कोरोनाच्या या प्रतिरूपाने अवघ्या काही दिवसांतच देशातील ७० टक्के रुग्णांना आपल्या विळख्यात घेतले आहे. 

आता A3i हे कोरोनाचे प्रतिरूप भारतातून हळूहळू नष्ट झाल्याच आश्चर्य वाटायला नको, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र आता A3i या प्रतिरूपाचे स्थान A2a या प्रतिरूपाने घेतले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाचे हे प्रतिरूप अधिक वेगाने फैलावते. आता कोरोनाचे A2a हे रूप देशात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. 

सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार वाटत असलेल्या भीतीप्रमाणे कोरोनाच्या A2a या रूपाने इतर जगाप्रमाणे भारतातही आपले हातपाय पसरले आहेत. मात्र संपूर्ण जगात पसरलेल्या विषाणूमधील एकाच प्रकारच्या जीनोममुळे एकाच प्राकरची लस आणि औषध या म्युटेशनविरोधात परिणामकारक ठरेल. मात्रा कोरोनाचे A2a हे प्रतिरूप A3i या प्रतिरूपापेक्षा अधिक धोकादायक आहे किंवा नाही याबाबत अभ्सासातून स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र A2a या प्रतिरूपाच्या संसर्गाचा वेग हा खूप अधिक असल्याचे समोर आले आहे. आता जोपर्यंत प्रभावी लस विकसित होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या A2a या प्रतिरूपापासून वाचणे हाच एकमेव उपाय असेल.

हे पण वाचा-

पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या