शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: कोरोनानंतरच्या पुढील महामारीत अँन्टिबायोटिक्स औषधांचा उपयोग नाही; वैज्ञानिकांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 23:25 IST

काही बॅक्टेरिया असे आहेत की त्यावर अँन्टिबायोटिक्स औषधांचा प्रभाव चालत नाही. पुढील महामारी बॅक्टेरिया संबंधित असू शकते.

ठळक मुद्देहे आजार जगातील कोणत्याही देशात कोणत्याही कोपऱ्यात पसरू शकतात. अँन्टिबायोटिक्स औषधं बनवणाऱ्या कंपन्यांनी त्याच्या औषधांवर पुन्हा फेरचाचणी करून त्यांची ताकद वाढवावी. या आजारावर कोणतंही औषधं उपयोगी न ठरल्याने तो आणखी धोकादायक बनू शकतो.

अँन्टिबायोटिक औषधं आधुनिक आरोग्य पद्धतीत सर्वात मोठा शोध आहे. ही पद्धत लाखो-करोडो लोकांचे जीव वाचवते. परंतु पुढील महामारी अशी असेल ज्यावर अँन्टिबायोटिक, अँन्टिमाइक्रोबियल, अँन्टिबॅक्टिरियल औषधांचा काहीच परिणाम होणार नाही असा खुलासा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. म्हणजे मानव सध्या अशा टाइमबॉम्बसोबत जगत आहे जो कधीही फुटू शकतो.

अँन्टिबायोटिक्स(Antibiotics) म्हणजे काय?

हा एक अँन्टिमाइक्रोबिय पदार्थ असतो तो बॅक्टेरियाच्या विरोधात लढतो. हा कोणत्याही प्रकारच्या व्हायरससोबत लढण्यास सक्षम असतो. अँन्टिबायोटिक औषधांचा वापर शरीरात सुक्ष्म जीवांच्या सहाय्याने पसरणाऱ्या संक्रमणाला रोखण्यास प्रभावी ठरतो. जेणेकरून शरीरात व्हायरस विकसित होऊ नये आणि तो संपुष्टात यावा. अँन्टिबायोटिक्सची ताकद आणि सहजपणे उपलब्ध होत असल्याने जगभरात या पद्धतीला मानलं जातं. परंतु खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर होऊ लागला आहे. काही बॅक्टेरिया असे आहेत की त्यावर अँन्टिबायोटिक्स औषधांचा प्रभाव चालत नाही. पुढील महामारी बॅक्टेरिया संबंधित असू शकते. त्यामुळे सध्या अँन्टिबायोटिक्स विरोधी आजारांबद्दल जगभरातील वैज्ञानिक चिंतेत आहेत. ही समस्या मोठी होऊन समोर येत आहेत.

जागतिक आरोग्य संघटना(WHO)ने अँन्टिमाइक्रोबियल रजिसटेंसला जागतिक धोका म्हटलं आहे. संघटनेचं म्हणणं आहे की, भविष्यात अशा आजार गंभीर होऊ शकतात. आतापासून याला सुरुवात झाली आहे. हे आजार जगातील कोणत्याही देशात कोणत्याही कोपऱ्यात पसरू शकतात. कोणत्याही वयोगटातील लोक याला बळी पडू शकतात. या आजारावर कोणतंही औषधं उपयोगी न ठरल्याने तो आणखी धोकादायक बनू शकतो. डच बायोटेक, लाइफ सायन्स संस्थेचे एमडी एनीमीक वर्कामैन सांगतात की, अँन्टिबायोटिक्स विरोधी आजार मोठा धोका आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी हा एक इशारा आहे. पुढील महामारी बॅक्टेरियासंबंधित असेल. काही औषध कंपन्या त्यांच्याकडून अँन्टिबायोटिक्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात हा आजार पसरल्यास त्याला रोखण्यासाठी ही औषधं पुरेसी नाहीत.

अँन्टिबायोटिक्स औषधं बनवणाऱ्या कंपन्यांनी त्याच्या औषधांवर पुन्हा फेरचाचणी करून त्यांची ताकद वाढवावी. किंवा उत्पादन कंपन्यांनी असं तत्व बनवावं जे अँन्टिबायोटिक्स विरोधी आजार समजू शकत नाही आणि नष्ट होईल. केव्हाही असं औषध बनल्यास तात्काळ क्लिनिकल ट्रायलला पाठवून मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन करण्याची क्षमता ठेवावी लागणार आहे. बेल्जियममध्ये काही संशोधक यावर रिसर्च करत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या