शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होईल, सरकारी सूत्रांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:00 IST

Coronavirus : देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे.

नवी दिल्ली : देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, पुढील महिन्याच्या 15 तारखेपासून रोजची नवीन कोरोना प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे.

दरम्यान, सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 15 फेब्रुवारीपासून दररोज समोर येणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसेल. काही राज्ये आणि महानगरांमध्ये प्रकरणे कमी होऊ लागली आहेत आणि आता नवीन प्रकरणांची संख्या जवळपास स्थिर झाली आहे. तसेच, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या विरोधात देशव्यापी लसीकरण मोहिमेचा परिणाम कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम आधीच्या दोन लाटांपेक्षा खूपच कमी असण्यामागे लसीकरणाची भूमिका आहे. देशातील 74 टक्के वयस्कर लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्य मंत्रालय नवीन लाटेचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितले. 

दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णदेशात एका दिवसात कोरोनाचे 3,06,064 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,95,43,328 वर पोहोचली आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 22,49,335 वर पोहोचली आहे, जी 241 दिवसांतील सर्वाधिक आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 439 लोकांचा मृत्यू झाला. तर देशातील मृतांची संख्या 4,89,848 वर पोहोचली आहे.

एका दिवसात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 62 हजारांहून अधिकसध्या देशात 22,49,335 लोक कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 5.69 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 62,130 ची वाढ झाली आहे. देशातील रुग्णांचा बरे होण्याचा दर 93.07 टक्क्यांवर आला आहे. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोना संक्रमितांची संख्या 2 कोटी पार झाली होती आणि 23 जून 2021 रोजी 3 कोटी पार झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस