शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

साथीचे आजार व गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:02 IST

पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. मात्र, हाच पावसाळा सरला की उकाडा वाढतो, असह्य होतो.

- डॉ. गीता खरेपावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात. मात्र, हाच पावसाळा सरला की उकाडा वाढतो, असह्य होतो. मधूनच अवकाळी पावसाची एखादी सर बरसते आणि साथीचे विषाणूजन्य आजार आणि हिवताप आपले बस्तान बसवतात.गेल्या काही वर्षांत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला म्हणा किंवा शास्त्रात प्रगती झाल्यामुळे डेंग्यू व इतर विषाणूजन्य आजारांचे अचूक निदान व रक्ताच्या तपासणीत बिंबिका मोजणे अधिक सोपे होऊ लागले म्हणा. त्यातच भरीसभर आपण रहिवाशांनी व प्रशासनाने, शहरीकरण व सुधारणांच्या नावाखाली निवासाच्या ठिकाणी केलेला चिखल, दलदल व पर्यावरणाचा नाश. या सगळ्या गोष्टींमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या हल्ली वाढलेली दिसते.घरात डेंग्यू, हिवताप व इतर संसर्गजन्य आजाराचे रुग्ण असतील तर त्यांची माहिती नगरपालिका प्रशासनाला कळवणे, आम्हा डॉक्टरांना जसे बंधनकारक असते, बहुतेक तसेच डेंग्यूच्या रुग्णांच्या हितचिंतक व नातेवाइकांना, आम्ही दिलेल्या औषधांखेरीज, बिंबिका (प्लेटलेट्स) वाढवणारे घरगुती इलाज करणेही तितकेच महत्त्वाचे असते.या घरगुती उपायांमध्ये रुग्णांना पपई, किवीची फळे, पपईच्या झाडांची कोवळी पाने, बाजारात नव्याने शिरकाव करती झालेली लक्ष्मणफळे व मारुती फळे प्रमुख होत. आजाराची साथ व घरगुती उपायांच्या हव्यासापायी कित्येक पपईची झाडे, पाने व फळे तोडली गेल्यामुळे भकास होतात, कालांतराने खुंटतात वा जीवास मुकतात. अनेकदा या वाढत्या साथींबरोबर बाजारातील किवी फळांची किंमतही अकारण वाढते. बऱ्याचदा ती फळेच बाजारातून अदृश्य होतात. पपईच्या पानांच्या रसामुळे कित्येक रुग्णांना पोटातील आम्लता वाढल्यामुळे उलट्या होतात. बिंबिका कमी झाल्या असल्याने उलट्या होणे म्हणजे पोटातील अंतर्गत रक्तस्रावाला आमंत्रण देणे ठरते. तात्पर्य या आजारांवर अतिउत्साहाने कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक आहे.डेंग्यू व तत्सम आजारांच्या बाबतीत, साधारण अडीच ते तीन दिवस बराच ताप येतो, तो ताप उतरतोही. मात्र नंतर पांढºया रक्तपेशी व प्लेटलेट्स कमी व्हायला सुरुवात होते, अशक्तपणा येतो. आजारानंतरचा अशक्तपणा तर अतिशय तीव्र असतो. त्या थकव्यातून बाहेर येण्यास रुग्णांना एखादा आठवडा लागतो. पण ताप उतरला की रुग्णाची व त्यांच्या घरातील मंडळींना, त्यांचे दैनंदिन व्यवहार लवकरात लवकर चालू करण्याची घाई होते. नोकरीच्या ठिकाणी कामावर रुजू होणे तसेच मुलांना शाळेत पाठवणे याची लोकांना निकड वाटते. परंतु शाळेत वा कामाच्या ठिकाणी रुजू झाल्यावरही थकवा जाणवत असल्याने कित्येक जण घरी परत येतात. विषाणूजन्य साथीचे आजार व हिवताप गेल्यानंतरही घाई न करता घरी पुरेशी विश्रांती घेऊन नंतरच शाळेत अथवा नोकरीच्या ठिकाणी रुजू होणे योग्य ठरेल.डासांमुळे होणारे आजार साथीचे असले तरी एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीला संसर्ग करत नाहीत. हे आजार पसरण्यासाठी डासांची गरज असते. पण वरील गैरसमजामुळे या रुग्णांना अकारण वेगळे ठेवले जाते.साथीच्या व हवामान बदलामुळे होणाºया श्वसनविकारांत हवेतील प्रदूषणाचा मोठा वाटा असतो. आपण पाणी उकळवून व गाळून निर्जंतुक करू शकतो. मात्र तशी खिडक्यादारे लावून व धुळीचा बंदोबस्त करून, हवा निर्जंतुक करता येत नाही. परिणामी, परिसरातील प्रदूषण सर्व प्रतिबंधक उपाय करूनही आपल्याला त्रास देतेच. त्यामुळे व्यक्तिगत स्वच्छतेसोबत, परिसर स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. खाद्यपदार्थांतून होणाºया आजारांच्या बाबतीत, लोकांचा गैरसमज असा की, शीतकपाटातील बर्फात ठेवलेले पदार्थ निर्जंतुक राहतात आणि ते पदार्थ उकळल्यावर किंवा गरम केल्यावर खाण्यायोग्य निर्जंतुक होतात. या गैरसमजापोटी पादूषित पदार्थ खाल्ले व प्यायले जातात आणि हेच आजारांना आमंत्रण ठरते. आजारांच्याबाबत असलेल्या समज व गैरसमजाबद्दल डॉक्टर वा अधिकृत माहितीच्या स्त्रोताद्वारे (सोशल मिडिया नव्हे) आपल्या शंकांचे निरसन करावे. 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर