शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुलांचं बालपण जपा, नाहीतर ती होतील अकाली ‘प्रौढ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 18:15 IST

लहान वयातच मुलांवर नको त्या जबाबदार्‍या पडल्या तर कोमेजेल बालपण..

 - मयूर पठाडे

 
मुलांचं लहानपण जितकं सुखात, आनंदात आणि पालकांच्या छत्रछायेखाली उबदार वातावरणात जाईल, तितकी ती मुलं भविष्यात जबाबदार नागरिक बनतील, हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे.
त्यामुळेच ज्यांचं बालपण विपरित परिस्थित किंवा गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर गेलेलं आहे, अशा व्यक्ती त्यांच्या उत्तरायुष्यात गुन्हेगारच बनल्याचं आढळून येतं. 
तुरुंगात असलेल्या अनेक नामचिन गुंडांचा आणि त्यांच्या पुर्वायुष्याचा अभ्यास केल्यावर ते ‘असे’ का झाले याचं उत्तर त्यांच्या बालपणातच सापडतं. या गुन्हेगारांनी स्वत:ही त्याबद्दल ‘परिस्थिती’लाच दोष दिलेला आहे. 
याचा अर्थ गुन्हेगारी वातावरणात वाढलेली प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच बनेल असं नाही, पण गैरमार्गाकडे वळण्याची त्यांची शक्यता खूप जास्त असते.
 
 
त्यामुळेच मुलांचं लहानपण चांगल्या वातावरणात जाणं खूप आवश्यक आहे.
घरची परिस्थिती कशी आहे यावरही मुलं भविष्यात काय बनतील, काय करतील हे बरंचसं अवलंबून असतं.
संशोधकांनी बरीच वर्षे संशोधन करून आता आणखी एक नवीन निष्कर्ष काढला आहे. तुमचं लहानपण जर खूपच गरिबीत आणि हलाखीत गेलं असेल तर त्याचा तुमच्या भविष्यावर तर परिणाम होतोच, पण इतरांपेक्षा तुम्ही वयातही खूप लवकर येता. जबाबदार्‍या लवकर अंगावर पडल्यानं तुमचं बालपण तर कोमेजतच, लहान वयातच तुम्हाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात, पण नैसर्गिकरित्याही तुम्ही लवकर वयात येता, तुमच्या वयाच्या इतर मुलामुलींपेक्षा तुम्ही लवकर तारुण्यात येता, हेदेखील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
 
 
त्यामुळे पालकांनो, लक्षात ठेवा, आपली परिस्थिती जरी गरिबीची असेल, तरीही लहान वयातच आपल्या मुलामुलींना कामाला जुंपू नका. नको त्या वयात त्यांना न झेपणार्‍या जबाबदार्‍या सोपवल्या तर त्यांचं बालपण नक्कीच कोमेजेल आणि त्यांना अकाली प्रौढत्वही येईल.