शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचं बालपण जपा, नाहीतर ती होतील अकाली ‘प्रौढ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 18:15 IST

लहान वयातच मुलांवर नको त्या जबाबदार्‍या पडल्या तर कोमेजेल बालपण..

 - मयूर पठाडे

 
मुलांचं लहानपण जितकं सुखात, आनंदात आणि पालकांच्या छत्रछायेखाली उबदार वातावरणात जाईल, तितकी ती मुलं भविष्यात जबाबदार नागरिक बनतील, हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे.
त्यामुळेच ज्यांचं बालपण विपरित परिस्थित किंवा गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर गेलेलं आहे, अशा व्यक्ती त्यांच्या उत्तरायुष्यात गुन्हेगारच बनल्याचं आढळून येतं. 
तुरुंगात असलेल्या अनेक नामचिन गुंडांचा आणि त्यांच्या पुर्वायुष्याचा अभ्यास केल्यावर ते ‘असे’ का झाले याचं उत्तर त्यांच्या बालपणातच सापडतं. या गुन्हेगारांनी स्वत:ही त्याबद्दल ‘परिस्थिती’लाच दोष दिलेला आहे. 
याचा अर्थ गुन्हेगारी वातावरणात वाढलेली प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच बनेल असं नाही, पण गैरमार्गाकडे वळण्याची त्यांची शक्यता खूप जास्त असते.
 
 
त्यामुळेच मुलांचं लहानपण चांगल्या वातावरणात जाणं खूप आवश्यक आहे.
घरची परिस्थिती कशी आहे यावरही मुलं भविष्यात काय बनतील, काय करतील हे बरंचसं अवलंबून असतं.
संशोधकांनी बरीच वर्षे संशोधन करून आता आणखी एक नवीन निष्कर्ष काढला आहे. तुमचं लहानपण जर खूपच गरिबीत आणि हलाखीत गेलं असेल तर त्याचा तुमच्या भविष्यावर तर परिणाम होतोच, पण इतरांपेक्षा तुम्ही वयातही खूप लवकर येता. जबाबदार्‍या लवकर अंगावर पडल्यानं तुमचं बालपण तर कोमेजतच, लहान वयातच तुम्हाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात, पण नैसर्गिकरित्याही तुम्ही लवकर वयात येता, तुमच्या वयाच्या इतर मुलामुलींपेक्षा तुम्ही लवकर तारुण्यात येता, हेदेखील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
 
 
त्यामुळे पालकांनो, लक्षात ठेवा, आपली परिस्थिती जरी गरिबीची असेल, तरीही लहान वयातच आपल्या मुलामुलींना कामाला जुंपू नका. नको त्या वयात त्यांना न झेपणार्‍या जबाबदार्‍या सोपवल्या तर त्यांचं बालपण नक्कीच कोमेजेल आणि त्यांना अकाली प्रौढत्वही येईल.