शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आता दुसऱ्यांदा होणार नाही कॅन्सर? डॉक्टरांनी शोधून काढला इलाज; किंमत असेल केवळ 100 रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 16:08 IST

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या (TIFR) डॉक्टर आणि संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे आणि ती कॅन्सरवर मात केलेल्यांना पुन्हा कॅन्सर होण्यापासून वाचवू शकते...

जगभरात कँन्सर ग्रस्तांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. तरी जगण्याची शाश्वती देता येत नाही. मात्र, नुकतेच डॉक्टर आणि संशोधकांनी कॅन्सरवरील इलाजासंदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) च्या डॉक्टर आणि संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे आणि ती कॅन्सरवर मात केलेल्यांना पुन्हा कॅन्सर होण्यापासून वाचवू शकते.

10 वर्षांपर्यंत चालले संशोधन -इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टर आणि संशोधकांनी म्हटले आहे की, दहा वर्षांपर्यंत विविध प्रकारचे संशोधन करून अखेर आम्ही ही टॅबलेट तयार केली. टीआयएफआरच्या संशोधकांनी म्हटले आहे की, ही टॅबलेट केवळ दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासूनच वाचवू शकत नाही, तर  रेडिएशन आणि किमोथेरेपीमुळे होणारे दुष्परिणामही कमी करेल. वरिष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. राजेंद्र बडवे यांनी या टॅब्लेटसंदर्भात बोलताना म्हटले आहे की, "अनेक संशोधकांनी आणि डॉक्टरांनी दहा वर्षांपर्यंत कठोर परिश्रम घेत ही टॅब्लेट शोधून काढली आहे. तज्ज्ञांनी संशोधनासाठी मानवी कॅन्सरच्या पेशी उंदरांमध्ये टाकल्या. यानंतर उंदरांवर केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. यात संशोधकांना आढळून आले की, काही काळानंतर कॅन्सर पेशी मरण पावल्या आणि त्यांचे लहान लहान तुकडे झाले. याला 'क्रोमॅटिन कण', असे म्हटले जाते."

दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून वाचवेल ही टॅब्लेट -पुढे बोलताना बडवे यांनी सांगितले की, "संशोधकांनी उंदरांना दुसऱ्यांदा कॅन्सर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी रेझवेराट्रोल आणि कॉपर (R+Cu) युक्त प्रो-ऑक्सिडंट गोळ्या दिल्या. या संशोधनात असे दिसून आले आहे की, कॉपर (R+Cu) ऑक्सिजन रॅडिकल्स तयार करते आणि क्रोमॅटिन पेशी नष्ट करते."

"संशोधकांनी विकसित केलेली ही टॅब्लेट कॅन्सरच्या उपचारांचे दुष्परिणाम 50 टक्क्यांनी कमी करते आणि दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखण्यासाठी 30 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. मात्र, ही टॅबलेट बाजारात आणण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल," असेही बडवे यांनी म्हटले आहे.

कधीपर्यंत बाजारात येणार ही टॅबलेट - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे म्हटल्याप्रमाणे, ही टॅब्लेट जून-जुलैमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. ही टॅब्लेट अनेक कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरेल. हा टॅबलेट केवळ 100 रुपयांना उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीच्या संशोधकांचे म्हणणे आहे. ही टॅबलेट बाजारात आल्यास, हे टाटा इंस्टीट्यूटचे मोठे यश ठरेल.

टॅग्स :cancerकर्करोगmedicineऔषधंdoctorडॉक्टर